कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय ४२) यांनी मंगळवारी दुपारी कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद पाटील हे यापूर्वी लष्करी सेवेत १७ वर्षे कार्यरत होते. सध्या ते मीरा-भाईंदर येथे वाहतूक […]

अधिक वाचा..

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य, मार्गदर्शन आणि सक्षमीकरणासाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.यासंदर्भातील तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालय करण्यात आले. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एकल पाल्य, समान संधी, सन्मान आणि सक्षमीकरण’ या विषयावरील […]

अधिक वाचा..

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीस बंदी असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे. शाळांमध्ये ‘तंबाखूमुक्त’ फलक लावून जनजागृती केली जात असताना, […]

अधिक वाचा..

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देणाऱ्या ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांमुळे राज्यातील सुमारे २,२०० तंत्रशिक्षण संस्था, ६ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि लाखो विद्यार्थ्यांना थेट लाभ होत आहे. गेल्या तीन वर्षांत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावासह वहिनीने शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कारभारी कोळपे (वय ३८, रा. गुनाट, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असुन ७ जून २०२६ […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कार चालक असलेल्या तिच्याच पतीविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास नानाभाऊ इथापे (रा. गणेश […]

अधिक वाचा..

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवता येते. भाजलेल्या हरभऱ्याचा वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करावा. याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय हाडांना निरोगी ठेवण्यास मदत होते. हृदयासाठीही ते फायदेशीर आहे. पोटाची समस्या असो किंवा वाढलेल्या वजनाची समस्या, भाजलेले हरभरे खाल्ल्याने […]

अधिक वाचा..

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही क्रिया गरजेची असते. ही क्रिया पचन तंत्राचा महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे शरीरातून अपशिष्ट पदार्थ बाहेर निघतात. एक निरोगी व्यक्ती रोज टॉयलेटला जाते. त्याशिवाय दिवसातून दोन वेळा आणि आठवड्यातून तीन वेळ संडासला जाणं सामान्य मानलं जातं. पण असे बरेच लोक असतात, […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि बेस्ट […]

अधिक वाचा..