गैरसमज दूर होईल; मनोज जरांगेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

जात प्रमाणपत्र रद्द, मराठा आरक्षण आणि गद्दारीच्या आरोपांवरून शिंदे-जरांगे आमनेसामने; निवडणुकीत आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत मराठा समाजाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. जात प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे शिंदे यांचाच हात असल्याचा दावा करत, “तुमच्यासाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्या, […]

अधिक वाचा..

जात प्रमाणपत्र वैध करा, अन्यथा सरकार पाडू; मनोज जरांगे यांचा फडणवीस-शिंदेंना इशारा

चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर ‘डबल ढोलकी’ वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप अंतरवाली सराटी: मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी गुरुवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, अवैध ठरवलेली […]

अधिक वाचा..

शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ‘शिवसेना कोणाची हे जनतेनेच ठरवलं’, शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात शिंदे गटाचा युक्तिवाद; ६० आमदारांच्या जनादेशाचा शिंदेंनी केला उल्लेख मुंबई: शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या मूळ अस्तित्वासंदर्भातील वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षातील फरक, पक्षघटना, अपात्रतेची कारवाई तसेच आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर सविस्तर […]

अधिक वाचा..

‘डोह’कार श्री.वि. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी (श्री.वि.) यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, श्री.वि. कुलकर्णी यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणशक्ती, निसर्गप्रेम आणि जीवनातील साध्या अनुभवांना असामान्य साहित्यिक अभिव्यक्ती देत […]

अधिक वाचा..

बहुमत नव्हे, उत्तरदायित्वच लोकशाहीची खरी ताकद! संसदेत सरकारने जनतेला जाब द्यायलाच हवा

मुंबई: भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे संसद. ती केवळ कायदे मंजूर करणारी संस्था नाही, तर जनतेच्या सार्वभौम इच्छेचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे. सरकारच्या निर्णयांची छाननी, राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संवाद आणि शासनाला उत्तरदायी धरण्याची प्रक्रिया संसदेतूनच घडते. त्यामुळे संसदेत चर्चा होणे आणि सरकारने जनतेच्या प्रतिनिधींसमोर आपल्या निर्णयांचा हिशेब देणे, ही […]

अधिक वाचा..

मुंबईतील फूटपाथ नेमके कुणासाठी? फेरीवाल्यांचा हक्क आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेत संतुलन कधी साधणार?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रोजगार, व्यवसाय आणि उपजीविकेसाठी दररोज लाखो नागरिक येतात. शहराच्या औपचारिक अर्थव्यवस्थेबरोबरच अनौपचारिक अर्थव्यवस्थेचेही मोठे योगदान आहे. फेरीवाले या व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र सार्वजनिक फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यास प्रश्न केवळ फेरीवाल्यांच्या उपजीविकेपुरता मर्यादित राहत नाही; तो थेट पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, वाहतूक व्यवस्थेचा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा बनतो. मुंबईतील अनेक […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा आत्मा मराठमोळ्या, रांगड्या आणि सेवाभावी शिवसैनिकातच!

मुंबई: शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या त्याग, निष्ठा आणि जनसेवेच्या भावनेतून उभी राहिलेली चळवळ आहे. या चळवळीचा खरा आत्मा कोणत्याही एका व्यक्तीत नसून प्रत्येक शिवसैनिकामध्ये आहे. हिंदुत्व, मराठी अस्मिता, जनसामान्यांचे प्रश्न आणि संघटनशक्ती या मूल्यांवर उभी राहिलेली शिवसेना आजही आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर पुढे जात असल्याचे समर्थकांचे मत आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. […]

अधिक वाचा..

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्याकडे राष्ट्रीय संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, विविध विभागांसाठीही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CJP राष्ट्रीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक – अभिजीत दीपके सहसंयोजक – आशुतोष रांका, सौरव दास राष्ट्रीय संघटन प्रभारी – अजिंक्य शिंदे […]

अधिक वाचा..

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी, आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित कारवाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. मुंबईतील टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन ब्रह्मपुरी: केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..