शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार ‘मित्रा’कडुन कारचा अपहार

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम आहे असे सांगत मित्राची चारचाकी कार घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असुन मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फिरोज हसन शेख (वय ३०, रा. गुनाट ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भगवान बाळू डोर्लेकर […]

अधिक वाचा..

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुरबिर सिंग, बर्नाड डिमेलो आणि श्रीकांत मोडक यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या तिघांनी जानेवारी 2026 मध्ये क्लबच्या टेरेसवर आयोजित केलेल्या बैठकीत Bhima Koregaon case मधील काही आरोपींना एकत्र आणल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. […]

अधिक वाचा..

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा दर्जा उंचावणे आणि पर्यटन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७७ वी सर्वसाधारण बैठक […]

अधिक वाचा..

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक पीडितांचा संशय कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ बनवत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी शाहिद समीर सनदे (वय २२) याला अटक केली असून […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या ‘औद्योगिक संबंध संहिता, २०२०’ आणि ‘वेतन संहिता, २०१९’च्या धर्तीवर तयार करण्यात आलेले ‘महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम, २०२६’ आणि ‘महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२६’ हे मसुदे २८ एप्रिल २०२६ रोजी राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या […]

अधिक वाचा..

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही अल्पवयीन बालिका मुंबईतील अतिगर्दीच्या परिसरात हरविल्यानंतर, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या एका तासात तिचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले. या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मंत्रालयात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या […]

अधिक वाचा..

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांना मिळणाऱ्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार विद्या ठाकूर, खासदार रवींद्र वायकर, तसेच म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. पत्रा चाळ प्रकरणात काही रहिवाशांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला वेग; राज्यभर ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली असून, जिल्हाध्यक्षांपासून ग्रामपातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी दिली. दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या बैठकीत जिल्हा व तालुका पातळीवरील नेतृत्वावर सविस्तर चर्चा झाली. पारदर्शक पद्धतीने जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात आली […]

अधिक वाचा..

खरीप आढावा बैठकीत ‘इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल’ची मांडणी

ठाणे: उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल” सादर करत ग्रामीण विकासाचा व्यापक रोडमॅप मांडला. शेती, जलसंधारण, हवामानाधारित नियोजन, आरोग्य सुविधा आणि घरांचे नियमितीकरण या सर्व घटकांचा समन्वय साधून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना शिंदे […]

अधिक वाचा..

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन

ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या उपक्रमातून ‘ग्रामीण ते अवकाश’ हा व्हिजन प्रत्यक्षात उतरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.या शैक्षणिक सहलीला 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता […]

अधिक वाचा..