अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला दिलासा

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा रंगली असून, या बजेटमध्ये मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. त्या विश्व मराठी संमेलन २०२५ च्या कार्यक्रमात बोलत होत्या. १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त – सामान्य जनतेसाठी मोठा दिलासा “या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात […]

अधिक वाचा..

सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रियेची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करावेत

पुणे: तिसरे विश्व मराठी संमेलन २०२५ उत्साहात सुरु असून, आज दुसऱ्या दिवशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कायदा व महिलांना मराठी भाषेत न्याय या विषयावर दोन विशेष परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. अनुराधा परदेशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. या परिसंवादात महिला सक्षमीकरण कायद्याची अंमलबजावणी आणि […]

अधिक वाचा..

वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे अस्वस्थता निर्माण होऊन, पोषण घटकांचे शोषण कमी होऊ शकते. कन्सल्टंट डाएटिशियन आणि डायबेटिस एज्युकेटर यांच्या म्हणण्यानुसार, या बदलांना समजून घेणे आवश्यक आहे. कारण- त्यामुळे वयाशी संबंधित पचनाच्या समस्यांचा सामना करणे आणि पचनसंस्थेची योग्य तंदुरुस्ती राखणे सोपे […]

अधिक वाचा..

डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलरच्या अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका

पेनकिलर्स जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी औषधे आहेत. यामध्ये ओव्हर-द-काउंटर पर्यायांपासून ते प्रिस्क्रिप्शन औषधांपर्यंतचा समावेश आहे आणि या औषधांनी डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या वेदनांसारख्या विविध समस्यांवर त्वरित आराम मिळतो. परंतु, पेनकिलर्सच्या अतिवापरामुळे किंवा अयोग्य वापरामुळे आरोग्याच्या महत्त्वपूर्ण समस्या उद्भवू शकतात, विशेषत: पोट आणि किडनीसंबंधित गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. पेनकिलर्सबद्दल माहिती पेनकिलर्स औषधांचे मुख्यतः […]

अधिक वाचा..

आजच्या अर्थसंकल्पामुळे लक्ष्मी आपल्या पायाने मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये चालत आली आहे…

मुंबई: मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात दिवाळी साजरी करणारा म्हणजे लक्ष्मी आपल्या पायाने मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये चालत आली आहे अशाप्रकारची भावना देशातील तमाम मध्यमवर्गीय कुटुंबात निर्माण झाल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आजच्या अर्थसंकल्पावर माध्यमांशी मांडले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यावर आनंद परांजपे यांनी माध्यमांशी […]

अधिक वाचा..
kadba-chor

Video: शिरुर तालुक्यातील कडबा पेंढी चोर झाला सीसीटीव्हीत कैद; ओळखा कोण?…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या ज्वारी काढणीला वेग आला असून दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरीही मोठया प्रमाणात ज्वारीचे पिक घेत नसल्यामुळे कडब्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे रांजणगाव परीसरात एका भामट्याने अनोखी शक्कल लढवत एका शेतकऱ्याच्या वावरातील थोड्या थोड्या करुन एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७५ कडब्याच्या पेंढ्यांची चोरी केली आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील मलठणमध्ये किराणा व्यवसायिकाला दोघांची मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील किराणा दुकानदार योगेश मनोहर दंडवते हे त्यांच्या किराणा दुकानासमोरुन त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरुन काढुन पाठीमागे घेत असताना बाळु भिमाजी बरकडे व सावळेराम भिमाजी बरकडे दोघेही (रा. दत्तनगर मलठण, ता.शिरुर, जि. पुणे) यांनी त्यांचाकडील मोटर सायकलने पाठीमागुन दंडवते यांच्या चारचाकीला धडक दिल्याच्या कारणावरुन एकाने दगड फेकुन मारला तर दुसऱ्याने हाताने […]

अधिक वाचा..

केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 80 हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. 18 लाख उत्पन्नधारकांना 70 हजारांचा फायदा होणार आहे. 25 लाख उत्पन्न असलेल्यांचा कर 1 लाख 25 हजारांनी कमी […]

अधिक वाचा..

केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया, वरवर आकर्षक वाटणारे बजेट केवळ गोलमाल

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना मोठमोठे दावे केले, अत्यंत चमकदार अंदाजात सादर करुनही अर्थसंकल्प समाधानकारक झाला नाही, या बजेटने गुंतवणूकदार प्रभावित झाले नाहीत. तसेच शेतकरी, व्यापारी व सामान्य नागरिकाचीही निराशाच केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही आणि शेतमालाच्या हमीभावाबदद्लही काहीच नाही. केंद्रीय अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा भुलभुलैया व गोलमाल आहे, अशी […]

अधिक वाचा..