गल्लीतून दिल्लीपर्यंत! सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल

मुंबई: भारतीय लोकशाहीत प्रतिनिधित्वाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचवणे आणि वंचित समाजघटकांना निर्णयप्रक्रियेत स्थान देणे ही खरी लोकशाहीची कसोटी आहे. अशा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी उपेक्षित, वंचित दलित समाजातून आलेल्या, उच्चशिक्षित आणि समाजकार्यात सक्रिय असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गर्भलिंग तपासणीसारख्या कायद्याने पूर्णपणे बंदी असलेल्या घृणास्पद प्रकाराला शिरुरमध्ये आता हायटेक रूप मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणात राजरोजपणे दिवसाढवळ्या बेकायदेशीर अवैध वाळू उपसा सुरुच आहे. शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाने सहा वेळा संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी फोडल्या. मात्र, या सर्व कारवायांनंतरही एकाही वाळू माफियावर गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण […]

अधिक वाचा..

औषध घेतांना काय टाळाव

काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येक वेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून डॉक्टर रूग्णांना औषध वेळेवर घेण्या सोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधावरही प्रभाव पडत असतो. केळी: आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळी मध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर […]

अधिक वाचा..

सुंठ खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

1) हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. 2) आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा. 3) आलं हे अग्निदीपक आहे. […]

अधिक वाचा..

ताण व्यवस्थापन, तणाव कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

आजच्या धावपळीच्या जीवनात ताण (स्ट्रेस) हा एक सामान्य भाग बनला आहे. पण जर तुम्ही योग्यप्रकारे त्याचे व्यवस्थापन केले नाही, तर त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. येथे काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला ताण कमी करण्यास मदत करतील. 1) नियमित व्यायाम रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. चालणे, धावणे किंवा योगा […]

अधिक वाचा..

कामगार साहित्य वाटपातील गोंधळावर सरकारला धारेवर; विजय वडेट्टीवार यांचा मुदतवाढीवर सवाल

मुंबई: अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप करताना झालेल्या गोंधळावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरत कामगार विभागातील गैरव्यवहार आणि एका अधिकाऱ्याला मिळालेल्या नियमबाह्य मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक […]

अधिक वाचा..

तहसील कार्यालयांत दलालांचे जाळे? आमदार अस्लम शेख यांचा गंभीर आरोप; चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई: राज्यातील तहसील कार्यालये दलाल आणि भ्रष्टाचार्‍यांचा अड्डा बनल्याचा गंभीर आरोप आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला. उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईल व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी अधिकारी आणि दलाल यांचे संगनमत असून विद्यार्थी व पालकांकडून १५ ते २० हजार रुपयांपर्यंत वसुली होत असल्याचा दावा त्यांनी केला. तहसील कार्यालयांतील भ्रष्टाचाराचे विदारक वास्तव मांडताना शेख म्हणाले की, उत्पन्न […]

अधिक वाचा..

विधानभवन येथे महिला सुरक्षा सेफ्टी ऑडिटचा आढावा; तातडीच्या अंमलबजावणीचे निर्देश

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित […]

अधिक वाचा..

जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या. या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे […]

अधिक वाचा..