ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

मुंबई: मुंबईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील कुच्ची गावाहून मुंबईतील माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्थान लेव्हर या कंपनीत नोकरी केली होती. आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र नव्हे, घोषणांचा महाराष्ट्र! राज्याच्या अर्थसंकल्पावर अमोल मातेले यांची घणाघाती टीका

मुंबई: महाराष्ट्र सरकारने सादर केलेला 2026 चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा नसून “घोषणांचा महाराष्ट्र” घडविण्याचा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. सरकारने अर्थसंकल्पात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प “नाव मोठे […]

अधिक वाचा..

प्रेमप्रकरणातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा यांची हत्या; आरोपी अटकेत

श्रावस्ती (उत्तर प्रदेश): प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा (35) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज वर्मा या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंचल मिश्रा या किसान युनियनच्या सभेला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याने […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा! फडणवीसांच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला प्राधान्य

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना कृषी क्षेत्राला मोठे प्राधान्य दिले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात […]

अधिक वाचा..

सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी हाती धरला भगवा

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटातील विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश  मुंबई: नाशिक जिल्ह्यातील येवला लासलगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

शेखचिल्लींच्या विकासात गुदमरतेय मुंबई; निसर्ग, नागरिक आणि नियोजनाचा प्रश्न

मुंबई: मुंबईच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियोजित बांधकामांमुळे शहराचा नैसर्गिक समतोल ढासळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. खारफुटींचा नाश, मोकळ्या जागांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा व भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये वाढत आहे. मुंबई विकास आराखडा २०३४ अंतर्गत शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा सुधारणा […]

अधिक वाचा..

वाहतूकदारांनी राज्यव्यापी संप मागे घेतला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची यशस्वी शिष्टाई मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना ग्लोबल करिअरची संधी! जर्मन-जपानी भाषा प्रशिक्षणासाठी करार

मुंबई: अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्ये प्राप्त व्हावीत तसेच परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित सामंजस्य करार डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ,मुंबई येथे करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपोल […]

अधिक वाचा..

ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक;  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ सर्वसमावेशक कायदा तयार करणे आवश्यक असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. तसेच कामगारांना आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे तात्काळ मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विधानभवनात ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व […]

अधिक वाचा..

दालमिया सिमेंट अपघातावर विधानसभेत संताप! जखमी कामगारांना ५० लाख मदत द्या; विजय वडेट्टीवार

मुंबई: चंद्रपूर येथील दालमिया सिमेंट कारखान्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन कामगार गंभीर जखमी झाल्याच्या घटनेवर विधानसभेत तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रशासकीय अनास्था आणि कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. चंद्रपूर येथील सिमेंट कंपनीतील अपघातात दोन जण गंभीर जखमी […]

अधिक वाचा..