मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; दिल्ली दौऱ्यासाठी एअर इंडियाने प्रवास

मुंबई: पंतप्रधान यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खासगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास केला. ते आज दुपारी ४ वाजताच्या विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन २.०’च्या विशेष आढावा बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे दिल्लीला […]

अधिक वाचा..

शिरुर; निमोणे येथील माजी सरपंच पांडुरंग दुर्गे यांचे निधन

न्हावरे (प्रतिनिधी) निमोणे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच पांडुरंग विठोबा दुर्गे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने निमोणे गावासह शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निमोणेचे ग्रामपंचायत सदस्य अतुल दुर्गे यांचे ते वडील होते. पांडुरंग […]

अधिक वाचा..

कॉलेज-कोचिंग संगनमतावर कारवाईची मागणी; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई: राज्यभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मंत्रालयात भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेज आणि […]

अधिक वाचा..

महागाई ही मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम; अतुल लोंढे

NEET विद्यार्थ्यांच्या मृत्यूंसाठी केंद्र जबाबदार  मुंबई: देशातील वाढती महागाई ही केवळ इराण युद्धामुळे नसून मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील चुकीच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांचा परिपाक असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते Atul Londhe यांनी केला आहे. तसेच NEET पेपरफुटीमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या “सरकारने घेतलेले बळी” असल्याचे म्हणत केंद्रीय शिक्षण मंत्री आणि […]

अधिक वाचा..

दादा, जरा फोन बघाल का? माणुसकीच्या नावाखाली नवी डिजिटल फसवणूक; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

मुंबई: आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, व्हिडिओ KYC आणि बायोमेट्रिक पडताळणी यांचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीच्या नव्या पद्धती शोधल्या आहेत. “दादा, जरा फोन बघाल का?”, “OTP वाचून सांगा”, “फेस स्कॅन करा” अशा विनंत्यांच्या माध्यमातून नागरिकांची बायोमेट्रिक माहिती, आवाज आणि चेहऱ्याचे तपशील चोरून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर […]

अधिक वाचा..

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन; प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाबळ: कान्हूर मेसाई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात तसेच वस्त्यांच्या परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कान्हूर परिसरातील शेतांमध्ये आणि गावालगतच्या भागात काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतीकामासाठी, पाणी भरण्यासाठी […]

अधिक वाचा..
dead

Video: पाबळ-कान्हूर मेसाई रस्त्यावर विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

शिरूर (तेजस फडके): पाबळ (ता. शिरूर) येथील कान्हूर मेसाई रस्त्यावर सोमवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. संबंधित घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. भास्कर शिवलाल मकवाणे (वय ६०, रा. पाबळ) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. आशा बाळू घोलप (रा. घोलपवाडी, कान्हूर मेसाई), दुचाकीस्वार […]

अधिक वाचा..

धुळेतील दुहेरी हत्याकांडाने खळबळ; भोंदूबाबाकडून तरुण-तरुणीची हत्या

धुळे: Dhule जिल्ह्यातील Sakri तालुक्यातील कासारे गावात एका भोंदूबाबाने दोन तरुणांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरीत स्थैर्य आणि कौटुंबिक सुखासाठी पूजा करण्यास गेलेल्या जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांची हत्या झाल्याची कबुली आरोपी योगेश खैरनार याने पोलिसांसमोर दिली आहे. पूजेनंतर जयश्रीवर गैरवर्तनाचा प्रयत्न माहितीनुसार, जयश्री रजनीकांत काकुस्ते आणि अक्षय गंगाधर सोनवणे […]

अधिक वाचा..

‘अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्षच नव्हता’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: Sanjay Raut यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना Ajit Pawar, Praful Patel, Sunil Tatkare आणि Dhananjay Munde यांच्यावर जोरदार टीका केली. महापालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भूमिका […]

अधिक वाचा..