सुर्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळा दूर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने जलपुरवठा सुरू होणार मुंबई: मीरा–भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सुर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून, मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा […]

अधिक वाचा..

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिर झाली असून या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी […]

अधिक वाचा..

संविधान दिनानिमित्त टिळक भवन येथे २६ नोव्हेंबर रोजी विशेष व्याख्यान

मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार (दि. २6) नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे ‘प्रजासत्ताक आभास का वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार […]

अधिक वाचा..

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार

औरंगाबाद: भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनली आहे. आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे 5 लाखांचे कव्हर वाढवून 10 लाख रुपये करण्यात आले आहे. चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया. आयुष्मान भारत म्हणजे काय ही केंद्र सरकारची महत्वाची आरोग्य विमा योजना […]

अधिक वाचा..

भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये कशी रूपांतरित करायची

औरंगाबाद: जमिनीचे रुपांतर म्हणजे शेती जमीन इतर उपयोगासाठी बदलण्याची सरकारी प्रक्रिया. खाली संपूर्ण मार्गदर्शक माहिती दिली आहे. अर्जाची प्रक्रिया जवळच्या तहसील किंवा प्रांत कार्यालयात रूपांतरासाठी अर्ज सादर करा सर्वे नंबर, गट नंबर, जमीन कोणत्या प्रकाराची आहे याची अचूक माहिती नमूद करा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे ओळखपत्र (आधार / पॅन / मतदानकार्ड) सातबारा उतारा आठ अ […]

अधिक वाचा..

आनंद करंदीकर यांच्या विचारांची परंपरा जिवंत राहील; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: स्व. डॉ. आनंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभा दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थी सहायक समिती हॉल, एफ.सी. रोड, पुणे येथे अत्यंत भावस्पर्शी वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास काळे होते, तर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भावनिक मनोगत सभेचा समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र खोटारडेपणा व चॉकलेटच दिले

महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या शरद पवारांना सत्ताधाऱ्यांकडून त्रास मुंबई: काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त […]

अधिक वाचा..

घरात बसून तोंड पाटील की करणाऱ्यांना धडा शिकवा, दहशत झुगारून विकासाला मतदान करण्याचे आवाहन

धनुष्यबाणासमोरील बटन दाबून, विजयी गुलाल उधळा अक्कलकोट: नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे प्रचंड जनसागर उसळला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाभोवती निवडणूक फिरत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक सभेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. अक्कलकोट येथे झालेल्या सभेत ते […]

अधिक वाचा..

ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भावनिक सलाम

मुंबई: कुलाबा येथे आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर्स’ कार्यक्रमात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांचे तसेच पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक झाले. “ताज हॉटेलसमोर उभं राहिलं की त्या दिवसाचे आगीचे आवाज, धूर आणि भीतीचा थरकाप आजही मनात जिवंत आहे. आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात,” अशा शब्दांत त्यांनी त्या काळातील भीषण परिस्थितीचे वर्णन […]

अधिक वाचा..

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात 100% मोफत सुविधा करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा हस्तक्षेप मुंबई: मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना केवळ २५ टक्के सवलत मिळत असल्याने त्यांचा आर्थिक आणि दैनंदिन प्रवासाचा ताण वाढत असल्याचे लक्षात घेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी मांडलेल्या मागणीला […]

अधिक वाचा..