सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई: विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील सहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, इतकी भीषण घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा आहे? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे का? […]

अधिक वाचा..

बेताल वक्तव्यांना लगाम हवा! शिवराय–संभाजीराजांवरून पुन्हा राजकीय वाद पेटला

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. राज्याभिषेकासंदर्भातील वादग्रस्त दावे, विधानसभेतील वक्तव्ये आणि साहित्यिक लिखाण यामुळे राजकीय वातावरण तापले असून इतिहासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी “अंगठ्याने अभिषेक” झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात असला, तरी इतिहासातील प्रमुख साधनांमध्ये याचा कोणताही पुरावा […]

अधिक वाचा..

रिॲलिटी शोच्या नावाखाली ५० लाखांचा व्यवहार; सेवानिवृत्त एचओडीची गोळी झाडून हत्या, तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर: रिॲलिटी शो सुरू करण्याच्या नावाखाली ५० लाख रुपये घेतलेल्या तरुणांनी पैशांच्या वादातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त विभागप्रमुखाची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत तिघा आरोपींना अटक केली आहे. राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. तर विशाल विकास राठोड […]

अधिक वाचा..

आष्टीतील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर धक्कादायक घटना

महंत आदिनाथ महाराजांनी स्वतःवर वार करून घेतले जखमी आष्टी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. गडाचे प्रमुख महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी […]

अधिक वाचा..

आदमापूर येथील संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवात धडकी भरवणारी भाकणूक

तिसऱ्या महायुद्धासह मोठ्या संकटांचा इशारा आदमापूर: महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. या उत्सवासाठी राज्यासह पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेतील पारंपरिक भाकणूक ऐकण्यासाठी भाविक पहाटेपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षीच्या यात्रेत कृष्णात डोणे महाराज […]

अधिक वाचा..

मध्य-पूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारताला रशियन तेल आता रेकॉर्ड महाग

इराण: मध्य-पूर्वेत इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ला केल्यानंतर जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ झाली असून त्याचा परिणाम भारतावरही दिसू लागला आहे. यामुळे भारताला रशियाकडून मिळणारे कच्चे तेल आता रेकॉर्ड महाग दराने खरेदी करावे लागत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाने भारतासह काही देशांना मोठ्या सवलतीत […]

अधिक वाचा..

दहिसरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या चाकाखाली स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यु

मुंबई: मुंबईच्या रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच दहिसर पूर्व परिसरात एक अत्यंत धक्कादायक अपघात घडला असून अज्ञात वाहनाने चिरडल्याने एका स्कूटरस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील चौकीजवळ दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्कूटरवरून जात असलेला एक व्यक्ती अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून […]

अधिक वाचा..

कला केंद्राच्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २५ तरुणींची सुटका, उपसरपंच बर्गे प्रकरणातील नर्तिका अटकेत

माढा: मोडनिंब येथील पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’च्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी १५ मार्च रोजी छापा टाकून तब्बल २५ तरुणींची सुटका केली असून एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सर्वात […]

अधिक वाचा..

खडकवासला धरण परिसरात सतर्क सुरक्षारक्षकामुळे युवती सुरक्षित घरी

पुणे: खडकवासला धरण परिसरात रात्री नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षांच्या एका युवतीला तिचा मित्र एकटीला सोडून निघून गेल्याची घटना घडली. अंधारात ती एकटी उभी असताना धरण परिसरातील सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवर मदत मिळाली आणि पोलिसांच्या माध्यमातून ती सुखरूप घरी पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती गुरुवारी (ता. १२) आपल्या चुलतभावासोबत धरण परिसरात […]

अधिक वाचा..

बांधकामांवरील हवा गुणवत्ता सेन्सरची घोषणा हवेतच; पंधरा दिवसांतही अंमलबजावणी नाही

पुणे: शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एक हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर-आधारित हवा गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र पंधरा दिवस उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. शहरात धूलिकणांची पातळी वाढत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]

अधिक वाचा..