सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील जनुना येथे दुर्दैवी घटना

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना येथे सापाला जीवदान देण्याच्या प्रयत्नात सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिक सर्पमित्र मंगेश प्रकाश कांबळे (वय ३२) यांना सापाने दंश केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्पमित्रांमध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश कांबळे हे जनुना गावातील प्रसिद्ध सर्पमित्र म्हणून ओळखले […]

अधिक वाचा..

दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! स्वयंरोजगारासाठी थेट १५ हजारांची मदत

मुंबई: राज्यातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना थेट १५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून स्वावलंबनाकडे मोठे पाऊल टाकले जाणार आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या नव्या उपक्रमाची माहिती दिली. […]

अधिक वाचा..

केबिनमध्ये एकटी ये म्हणत विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन

कोल्हापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी वादात कोल्हापूर: कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा. सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. पीडित विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारींमध्ये जोशी यांच्या वागणुकीबाबत धक्कादायक बाबी उघड झाल्या असून, या प्रकरणामुळे महाविद्यालयीन परिसरात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, प्रा. जोशी विद्यार्थिनींना “केबिनमध्ये एकटीच ये, तुला समजून […]

अधिक वाचा..

यंदा शाळेला ४४ दिवसांची उन्हाळी सुट्टी जाहीर- पहिली ते नववीची परीक्षा २० एप्रिलपासून

औरंगाबाद: जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना तब्बल ४४ दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार असून शाळा १५ जूनपासून पुन्हा सुरू होतील. अंतिम सत्र परीक्षा कधी होणार जिल्हा परिषदेच्या २,७९५ शाळांसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या […]

अधिक वाचा..

अंगणवाडी-आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; EPF आणि पेन्शनचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका म्हणून विविध सरकारी योजनांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा निर्णय दिला असून त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेची हमी […]

अधिक वाचा..

महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक विभागाने ठोस पावले उचलावीत: डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

जागतिक महिला दिनानिमित्त विधानपरिषदेत विशेष चर्चा; ‘उभारी’ प्रकल्प आणि सुरक्षा ऑडिटवर दिला भर ​मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज विधान परिषद सभागृहात महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा घडवून आणण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या चर्चेचा प्रस्ताव मांडला. चर्चेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर संरक्षणासाठी राज्य सरकारने […]

अधिक वाचा..

दहावी-बारावी परीक्षेत कॉपीप्रकरणांवर मोठी कारवाई; ८१ जण निलंबित, २६९ प्रकरणे नोंद

मुंबई: सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीप्रकरणांवर कडक कारवाई करत ८१ जणांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड Higher सेकंडरी एडुकेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षांमध्ये विविध केंद्रांवर सामूहिक कॉपीप्रकरणे उघडकीस आल्यानंतर मंडळाने ही कठोर कारवाई केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना मदत केल्याचा आरोप असल्याने काही पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख तसेच संबंधित […]

अधिक वाचा..

दोन महिन्यांपासून बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर; कोल्हापुरात कुटुंबीयांचे आंदोलन, तपासावर प्रश्नचिन्ह

कोल्हापूर: जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (वय ५२) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवणासाठी घराबाहेर पडलेले पिळणकर अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला आहे. […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ महामार्ग लाडक्या उद्योगपतींसाठी रेडकार्पेट

मुंबई: अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच […]

अधिक वाचा..

वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्याची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेत नियम १०१ अन्वये लक्षवेधी सूचनेअंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्याबाबतचा मुद्दा विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर […]

अधिक वाचा..