jalana goat

बोकडाच्या डोक्यावर खास खूण, शेतकऱ्याला लागली लॉटरी; पाहा किंमत…

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याचे बोकडाच्या विक्रीतून नशीबच पालटणार आहे. कारण, बोकडाच्या डोक्यावर खास खूण असल्यामुळे मोठी किंमत मिळणार आहे. सध्या या बोकडाच्या दिमतीला सध्या चार माणसं कार्यरत आहेत. संबंधित बोकड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जामखेड गावातील शेतकरी प्रदीप म्हस्के हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. त्यांनी सहा शेळ्यांपासून हा व्यवसाय […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित…

मुंबई: राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे त्यामुळे खर्च केलेले […]

अधिक वाचा..

धडाकेबाज IAS अधिकारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली स्वेच्छा निवृत्ती

संभाजीनगर: आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले. धडाकेबाज आयएएस अधिकारी विभागीय […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर मधून दर ३६ तासाला १ पुरुष गायब

५ महिन्यात तब्बल २७९ पुरुष बेपत्ता… संभाजीनगर: गेल्‍या ५ महिन्यात संभाजीनगर शहरातील तब्‍बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्‍यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्‍हणजे पुरुषांच्‍या बेपत्ता होण्‍यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्‍य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे […]

अधिक वाचा..

उत्तम करीअर म्हणजे काय?

मुंबई: उत्तम करिअर करण हे सध्याच्या काळात सहज आणि सुलभ असू शकत का? असा सवाल बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडतो. या प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक बाजूचा आपण विचार करु या. गेल्या काही वर्षात विशेषत: गेल्या पाच सहा वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या विपुल संधी उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळू शकतात. अमुकच […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ? मुंबई: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून […]

अधिक वाचा..

…अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई: मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे. शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात […]

अधिक वाचा..

महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारावा; नाना पटोले

मुंबई: नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना करावा लागतो. महागाईने जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे, […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाणुळे मुंबई पाण्यात, कोट्यवधी रुपये गेले कुठे…

मुंबई: तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची […]

अधिक वाचा..

मुंबई, तुझा सरकारवर भरोसा हाय काय?

मुंबई: मागील सरकारच्या काळात मुंबई, तुझा बीएमसी वर भरोसा नाय काय नाय काय? हे गाण मुंबई तुबल्यावर  प्रसिद्ध झालं आणि मुंबईत पाणी तुंबण्यावरती खूप चर्चा झाली. मुंबईच्या सखल भागात नेहमीच पाणी साठत. समुद्रातून भरतीच्या वेळेला परत येणार पाणी आणि पावसाचं पाणी हे एकत्र होऊन मुंबई जलमय होते हे  सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना […]

अधिक वाचा..