लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब […]

अधिक वाचा..

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, भाजपाचा पराभव करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा बैठकीतही या […]

अधिक वाचा..

त्या 70 हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही पंतप्रधान सन्मान योजनेचे लाभ, कारण…

औरंगाबाद: संभाजीनगर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ७४४ शेतकऱ्यांपैकी ७०,२१४ शेतकऱ्यांचे पंतप्रधान सन्मान योजनेच अंतर्गत इ-केवायसी झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजनेच्या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुरु करण्यात येणाऱ्या नमो योजनेच्या लाभापासून देखील हे शेतकरी वंचित राहणार आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय केवायसी बाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १३,७२९ […]

अधिक वाचा..

‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’ अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घोषणा

दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी):  देशभरातील खेळासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे खचलेले मनोबल सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंशी राष्ट्रवादी काँग्रेस संवाद साधणार असून ‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’ या अभियानाची सुरुवात करत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केली. या […]

अधिक वाचा..

खेड तालुक्यातील वाफगाव येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनीवर…

राजगुरुनगर (प्रतिनिधी): वाफगाव (ता.खेड) येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनिवर येत असताना पँराशुट फुटले व त्याच्या आवाजाने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये काहीवेळ खळबळ उडाली. हे सॅटेलाईटच्या निरिक्षकाचे उपकरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून संबधित वस्तू पोलिसांनी पंचनामा करत ताब्यात घेतली. परंतु संबधित उपकरण हवामान विभागाचे असून कोणताही धोका नसल्याची माहिती हवामान विभागाने पत्राद्वारे दिल्याने सगळ्यांनाच […]

अधिक वाचा..

मंचर येथील पत्रकार सचिन तोडकर यांच्या चारचाकी गाडीने अचानक घेतला पेट

मंचर (प्रतिनिधी): येथील पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांचे कुटुंबीय भीमाशंकर येथे बुधवार (दि 31) रोजी देव दर्शनासाठी जात असताना पोखरी गावच्या हद्दीत चारचाकी कारने बुधवार दुपारी अचानक पेट घेतला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पत्रकार तोडकर यांचे बंधू हनुमंत तोडकर हे पाठीमागे दुसऱ्या गाडीत असल्याने त्यांनी पत्रकार तोडकर यांना गाडी पेटल्याची तत्काळ फोनद्वारे माहिती […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाशिवपुराण कार्यक्रमाच्या निमित्ताने 7 दिवस वाहतूक मार्गात बदल…

औरंगाबाद: संभाजीनगर शहरात १ ते ७ जूनदरम्यान श्रीराम मंदिर मठ बालाजी ट्रस्ट पिसादेवी येथे कथा वक्ते पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखंवाणीतून महाशिवपुराण हा सात दिवसीय कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती असणार आहे. त्यामुळे एक जून ते ७ जूनपर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे. […]

अधिक वाचा..

नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस सरकारने काम करावे, असे […]

अधिक वाचा..

मुंबईत ठिकठिकाणी सुरू करणार ‘हिरकणी कक्ष’; दीपक केसरकर

मुंबई: रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, […]

अधिक वाचा..

सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा…

मुंबई: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज भेट घेऊन केली. दरम्यान मुंबई पोलिस […]

अधिक वाचा..