शेतकऱ्यांना मदतच करायची असेल तर कृषी साहित्यातून होणारी GST लूट थांबवा…

मुंबई: केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार नाहीत. खते, बि-बियाणे, शेती […]

अधिक वाचा..

वाघोली येथे प्रेयसीने प्रियकराचा खून करत हाताची नस कापून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न 

वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथे एका बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीनेच चाकूने भोकसुन खून करुन स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असुन यशवंत महेश मुंढे (वय २२) सध्या (रा. वाघोली, मूळ रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर) असे खून […]

अधिक वाचा..

आई-वडिलांना सांभाळले नाही तर सरळ तुरुंगात जाल; जाणून घ्या काय म्हणतो कायदा…

औरंगाबाद: आजच्या काळात वृद्ध आई-वडील घरात असणे हे त्यांच्या मुलांना अडचणीचे वाटते. त्यामुळे मुले त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विसरत चालले आहेत. पण, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडल्यास तुरूंगवारी करावी लागणार आहे. दंड व शिक्षा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे व त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे, यासाठी ‘फौजदारी प्रक्रिया संहिते’मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पाल्यांना अथवा […]

अधिक वाचा..

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार…

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या […]

अधिक वाचा..

वाहतूक पोलिसाकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. सिग्नल तोडल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. शहरातील क्रांती चौकात हा सर्व प्रकार घडला असून, मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीमुळे सर्वत्र संताप व्यक्त […]

अधिक वाचा..

जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने ‘विश्वगुरु’ व्हावे; राज्यपाल रमेश बैस

मुंबई: जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने ‘विश्वगुरु’ व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.    मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल मुंबई या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत संस्थेच्या दहिसर मुंबई येथील शैक्षणिक संकुलात शनिवारी (दि. २०) संपन्न झाला. त्यावेळी […]

अधिक वाचा..

कितीही अडथळे आणले तरी वाळू धोरण यशस्वी करणार; विखे पाटील

संभाजीनगर: शासन सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना व उपक्रम राबवित आहे. सामान्य नागरिकाला केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतल्याने त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीत कोणीही कितीही अडथळे आणले तरी स्वस्त वाळूचे धोरण यशस्वी करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]

अधिक वाचा..

आता महाविकास आघाडीचेच दिवस येणार; धनंजय मुंडे

परळी: महाविकास आघाडी राज्यात एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या […]

अधिक वाचा..

सरसकट सर्वांची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक […]

अधिक वाचा..

पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटवरुन गुन्हा दाखल 

पुणे: येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन राज रावसाहेब गर्जे (रा. पाटसरा, ता.आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव असुन या संदर्भात महाविधी लाँ स्टुडंटन्स असोसिएशन या विधी शाखेतील विद्यार्थ्यांकरिता काम करण्याऱ्या सामाजिक संस्थेकडून चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची भेट घेऊन […]

अधिक वाचा..