बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा कारवाई करु मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कड कारवाई केली जाईल, […]

अधिक वाचा..

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश!

पालकांच्या संमतीनेच ठरेल ‘इंग्रजी’ शाळांची फी…   औरंगाबाद: चालू शैक्षणिक वर्षाची सुरवात १२ जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे. दोन वर्षांतून एकदा १५ टक्के शुल्क वाढीचा अधिकार संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आहे. दाखला नसेल, तरीही मिळणार प्रवेश पहिली-दुसरीत शिकत असलेला मुलगा इतर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत असल्यास त्याला […]

अधिक वाचा..

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे….

मुंबई: भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या […]

अधिक वाचा..

कांजुरच्या मेट्रो सहाच्या कारशेड मध्ये जमीन घोटाळा; आदित्य ठाकरे

मुंबई: शिवसेना नेते, युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मिधे आणि फडणवीस सरकारवर कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेड मुद्द्यावरना घेरत. या कारशेडच्या निर्णयामध्ये जमीन घोटाळा झाला असल्याचं आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. 15 हेक्टर जागा कारशेड साठी देण्याचं सांगितल जातं आहे. महसूल खात्याने सांगितला आहे की कांजुरची 15 आहेत तर जागा मेट्रोला हस्तांतरित करा.मेट्रो 6 साठी आम्ही […]

अधिक वाचा..
sangli bull

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…

सांगली: भिलवडीमधील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये चक्क मगर आणि बैलाचा चार तास थरारक पाठलाग पाहायला मिळाला. बैलाच्या मालकाने आणि नावाडी चालकांनी मगरीच्या तावडीत सापडण्याआधीच बैलाची सुटका केली. भिलवडीमधील अक्षय मोरे यांनी आटपाडीमधील जनावराच्या बाजारामधून 70 हजार रुपये देऊन खिलारी जातीचा बैल खरेदी केला होता. बैलाला टेम्पोमध्ये घेऊन ते गावी निघाले होते. बैलाला टेम्पोमधून उतरवत असताना अचानकपणे […]

अधिक वाचा..

पंढरपूर वारीच वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखांना होणार पालख्यांचं प्रस्थान…

औरंगाबाद: संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या असून संत तुकाराम महाराजांच्या देहू संस्थानमागोमागच आळंदी मंदिर समितीकडून वारी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 11 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची […]

अधिक वाचा..

अवकाळी पाऊसासह गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

मुंबई: मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोच एप्रिल महिन्यातही सुरु झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे, शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार तर फळबागांसाठी […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 87 शाळा बोगस….

औरंगाबाद: नुकतेच राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आली, आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील तब्बल 87 खासगी इंग्रजी शाळा बोगस असल्याचे समोर आले असून शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या बोगस शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात शाळांच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही

मुंबई: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. पंचनामे ताबडतोब करणे व तात्काळ मदत करणे अशी भूमिका राज्यसरकारची दिसत नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज राष्ट्रवादी भवन येथे बैठकीला आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला […]

अधिक वाचा..

शेतकरी म्हणाला, आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. २५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. शनिवारी रात्री […]

अधिक वाचा..