शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश!

महाराष्ट्र

पालकांच्या संमतीनेच ठरेल ‘इंग्रजी’ शाळांची फी…

 

औरंगाबाद: चालू शैक्षणिक वर्षाची सुरवात १२ जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे. दोन वर्षांतून एकदा १५ टक्के शुल्क वाढीचा अधिकार संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आहे.

दाखला नसेल, तरीही मिळणार प्रवेश

पहिली-दुसरीत शिकत असलेला मुलगा इतर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत असल्यास त्याला शाळा सोडल्याच्या दाखल्याची सक्ती करता येणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दाखला नसल्याने त्याला शिक्षण घेण्यास अडचणी येतील, तो शाळा सोडून देईल, असे प्रकार होवू नयेत, म्हणून हा निर्णय झाला आहे. पण, त्या मुलाकडे आधारकार्ड असावे. तो मुलगा त्याच्याकडील आधारकार्डवरून प्रवेश घेऊ शकणार आहे.

शासनाने दहा टक्के मदत करावी

इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दर दोन वर्षांनी १५ टक्के शुल्क वाढविण्याचा अधिकार आहे. ‘इंग्रजी’ शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, शुल्कासंदर्भातील तक्रारी देखील वाढत आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक शाळांच्या खर्चाचा दहा टक्के भार उचलला तर शैक्षणिक शुल्क कमी होऊन तक्रारी वाढणार नाहीत, अशी आमची मागणी आहे.

हरीष शिंदे, अध्यक्ष, मेस्टा संघटना (एफ), महाराष्ट्र