शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी… मुंबई: हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट […]

अधिक वाचा..

पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार; दिपक केसरकर मुंबई: केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय […]

अधिक वाचा..

राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा…

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारला […]

अधिक वाचा..

मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल…

अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले. कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात राम मंदिराबाहेर दोन गटात तुफान राडा

पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ… औरंगाबाद: सर्वत्र श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतानाच, छत्रपती संभाजीनगरातील किऱ्हाडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी दिल्याची घटना घडली. किऱ्हाडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री 12.30 वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना […]

अधिक वाचा..

गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही…

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली पुणे: दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचा आणि माझ्या गेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात उभ्या कारने घेतला पेट

कार खाक तर आग विझवण्यासाठी उपसरपंचांची धडपड शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे रस्त्याचे कडेला लावलेल्या कारने अचानक मोठा पेट घेतल्याने कार जळून खाक झाली असून कोणतीही हानी न होता दोन माजी उपसरपंचांच्या सतर्कतेने अनर्थ टळला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शेळ्यांच्या आठवडे बाजारात आज सकाळच्या सुमारास तुळापुर येथील मनोज कनीचे हे […]

अधिक वाचा..

शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करु 

जळगाव: शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे हे फडणवीसांनी दिलेली स्क्रिप्ट वाचणारा बोलका पोपट 

मुंबई: राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सुरात सुर मिसळला आहे. भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अपमान केला हे जनता अजून विसरलेली नाही. शुद्र शिवाजी राजा होऊ शकत नाही असे म्हणणाऱ्या विचारधारेच्या लोकांसोबत सत्तेत एकत्र बसलेलेले एकनाथ शिंदे फडणवीस यांनी दिलेली स्क्रिप्ट […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्‍याच दिवशी फिल्डवर…

मुंबई: राष्ट्रवादीकाँग्रेसची सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत… सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत… जनतेसोबत बांधिलकी असल्यानेच राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्‍या दिवशीच फिल्डवर पोचले याचा अर्थ राष्ट्रवादी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शनिवारी विधीमंडळाचे कामकाज संपले आणि दुसर्‍याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चार दिवसाच्या उत्तर महाराष्ट्राच्या तर […]

अधिक वाचा..