निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

श्रीगोंदयातील दुध भेसळ प्रकरणी शिरुर कनेक्शन उघड

शिरुर (अरुणकुमार मोटे): श्रीगोंद्यातील काष्टी येथील दुध भेसळीमध्ये पुणे जिल्हयातील शिरूरच्या कैलास बालाजी लाळगे सह जुन्नर तालुक्यातील उंब्रज येथील वैभव हांडे याला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. दूध हे प्रत्येक सर्वसामान्यांच्या जीवनातील एक अत्यावश्यक व अविभाज्य घटक आहे. अगदी लहान बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच अनेक खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी […]

अधिक वाचा..

अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिम्मत मोदींनी दाखवावी

मुंबई: मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार कोटी […]

अधिक वाचा..

सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा; डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक  सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सामाजिक उपक्रमांनी जनतेला जोडून घ्या. समाजाच्या कामाच्या माध्यमातून आपली प्रतिमा तयार करता येतील. या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. आज त्यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे येथे शिवसेना जिल्हा […]

अधिक वाचा..

जनहितार्थ महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय, रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही

मुंबई: रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. या जनहितार्थ निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. […]

अधिक वाचा..

मुंबई मराठीग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा स्नेहसंमेलन

मुंबई: शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगांव शाखेचे ७२ वे वार्षिक स्नेहसंमेलन (दि. ३०) मार्च २०२३ रोजी उत्साहात पार पडले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे सुधींद्र कुलकर्णी व […]

अधिक वाचा..

सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत केले अनोखे आंदोलन…!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील घटना… औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी आज पंचायत समिती कार्यालया फुलंब्रीसमोर तब्बल दोन लाख रुपयांची उधळण करीत शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला असून पंचायत समितीमध्ये दाखल विहिरीचा प्रस्ताव मंजूर करताना 12 टक्के रक्कम मागितली जाते असा आरोप त्यांनी यावेळी केला. पंचायत समिती कार्यालयात शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर शहरातील एकाचा मृत्यू, ७ जण जेरबंद…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा येथील राम मंदिरासमोरील राड्यात जखमी झालेल्या एकाचा काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला असून या राड्या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली असून शेख मुनिरुद्दिन मोईनुद्दीन (वय 54, रा. किराडपुरा) असे मृताचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्यांची नाव खालीलप्रमाणे सय्यद नूर सय्यद युसुफ (वय 27), धंदा – मजुरी […]

अधिक वाचा..

तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवा आम्ही या भागाचा विकास करुन दाखवू…

गोंदवले: श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात याआधीच पर्यटन विभाग आणि संबंधित मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. ग्रामस्थांनी याभागाच्या विकासाकरिता सविस्तर कृती आराखडा तयार करून तो सादर करावा. याभागाच्या विकासासाठी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांच्यावरती जनतेने विश्वास दाखवला तर तो आम्ही सार्थ करून दाखवू, असे मत उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने कात्री लावण्याचे केले पाप…

मुंबई: विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या […]

अधिक वाचा..