मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण मुंबई: कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्हि.आर. श्रीनिवास आदी […]

अधिक वाचा..

शिक्षणाबरोबर नैतिक मूल्य, संस्कृती,संस्कारक्षम शिक्षण असणे आवश्यक

मुंबई: देशाच्या प्रगतीला अधिक गती देताना शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्य, संस्कृती, संस्कारक्षम शिक्षण असणे काळजी गरज आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. पनवेल येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट,कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव समारंभ कार्यक्रम संपन्न […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना कोडींगचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा करार

मुंबई: कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिप फोर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक […]

अधिक वाचा..

राहुलजी गांधींवर बोलण्याएवढी नितेश राणेंची राजकीय उंची व पात्रता नाही…

मुंबई: काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुलजी गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही, त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल […]

अधिक वाचा..

शिवनेरी ते वढु बुद्रुक स्वतंत्र मार्गाचा मुख्यमंत्र्यांचा विचार

वढू बुद्रुकच्या ग्रामस्थांना दिली वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या शिष्ठमंडळाने नुकतेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ते छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढु बुद्रुक हा संपूर्ण मार्ग राज्यभरातील शिवभक्त व शंभूभक्तांसाठीचा […]

अधिक वाचा..

शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुंबई: स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी प्रेरणा जागृती करण्याचे काम करावे. राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि श्रीमती […]

अधिक वाचा..

सदा सरवणकरांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतोय म्हणून क्लीनचीट…

शिंदे – फडणवीस सरकार कायदा धाब्यावर बसवत आहे; महेश तपासे मुंबई: सदा सरवणकर हे बंदुकीचे परवानाधारक आणि त्यांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतो म्हणून क्लीनचीट मिळणार असेल तर शिंदे – फडणवीस सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे हे स्पष्ट होत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. शिंदे गटाचे […]

अधिक वाचा..

अदानी महाघोटाळ्यावर पंतप्रधान मोदी व भाजपा गप्प का?

मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग मिळून गप्प बसले आहे परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी […]

अधिक वाचा..

पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे. १२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात प्राथमिक व […]

अधिक वाचा..

छत्रपती संभजीनगर मध्ये गोळीबार…

औरंगाबाद: छ. संभजीनगरातील एपीआय कॉर्नरवरील जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावर विलास राठोड यांचे शुभम फायनान्स ॲन्ड मल्टिसर्व्हिसेस नावाचं कार्यालय असून या कार्यालयात शुक्रवारी रात्री दोन युवक पेट्रोल पंपाकडून आले. त्यातील एकाने कार्यालयात प्रवेश केला आणि दुसरा बाहेर थांबला. कार्यालयात जाताच आलेल्या तरुणाने पिस्तुल काढून थेट विलास राठोड यांच्या दिशेने गोळी मारली. मात्र सुदैवाने ती गोळी […]

अधिक वाचा..