राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा…

मुंबई: महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेला सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प स्थानिकांचा विरोध असताना सरकार […]

अधिक वाचा..

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरुर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित केला असल्यामुळे मराठवाडा तसेच शिरुरमधून येणाऱ्या वाहतुकीला मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. पुण्यात येणारी वाहतूक शिरुर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. यामुळे वेळेची बचत तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना सध्या मुंबईला […]

अधिक वाचा..
Gautami Patil

Video : गौतमी पाटील हिने बैलासमोर धरला ठेका; कारण…

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. तिच्या अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांनी राडा घातल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. पण, आता गौतमी पाटील ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली असून, तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बैलासमोर नाचताना दिसत आहे. मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव […]

अधिक वाचा..

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न करा

मुंबई: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे. […]

अधिक वाचा..

मोदींचा खरा चेहरा जनतेला कळाला, मोदी ना हिंदूंचे, ना मुस्लीमांचे, ना देशाचे…

मुंबई: केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने मागील ९ वर्षात जनतेसाठी काहीही केलेले नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून देशाची संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला. नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला असून नरेंद्र मोदी हे, ना हिंदूंचे आहेत, ना मुस्लीमांचे, ना देशाचे, असा घणाघाती […]

अधिक वाचा..

युवकांना रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी पुढाकार घ्यावा…

मुंबई: राज्यातील युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी महाराष्ट्र आणि जपान व्यापाराला चालना दिली पाहिजे. युवकांना जपानी भाषा सहज शिकता आली पाहिजे या साठी विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले. विधिमंडळ सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्याबाबत माहिती व प्रस्तावित प्रकल्पाबाबत अनौपचारिक चर्चा करण्यासाठी आज विधानभवनात लोकप्रतिनिधी, […]

अधिक वाचा..

सर्व जिल्ह्यात तीस एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालत

शिक्रापूर (शेरखान शेख): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार सर्व जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ३० एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. पुणे जिल्हयासह सर्व ठिकाणी होणाऱ्या या लोक अदालतमध्ये प्रलंबित असलेली […]

अधिक वाचा..

एखादा प्रकल्प होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे; शरद पवार 

मुंबई: एखादा महत्त्वाचा प्रकल्प राज्यात होत असताना त्यात स्थानिकांना विश्वासात घेतले पाहिजे. त्याला विरोध असेल तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. काल रिफायनरीला झालेल्या विरोधात आंदोलकांची तीव्र नाराजी माध्यमांमधून समोर आली. कोकणात नवीन काही होत असेल आणि त्यावर स्थानिकांच्या तीव्र भावना असतील तर कोणत्याही सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

टीका करणे सोप, पण सर्वसमावेशक कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही…

राज ठाकरे बोलले, ते अर्धसत्य मुंबई: तरूण पत्रकारांच्या मनात आग आहे, त्यांना काही करून दाखवायचं आहे.. मात्र ते ज्या माध्यमात काम करतात त्यांचे मालकच विकले गेले आहेत.. स्वत:च्या नोक-या टिकविण्यासाठी पत्रकारांना तडजोड करावी लागते”. असं राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, लोकमतच्या कार्यक्रमात खा. अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत,माध्यमांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे […]

अधिक वाचा..

धक्कादायक! प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, आरोपी प्राध्यापकसह पत्नीवर गुन्हा दाखल…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडीस आली असून वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका विद्यार्थिनीला घरी पेइंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहायक प्राध्यापकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशोक गुरप्पा बंडगर असे त्याचे नाव असून तो नाट्यशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहे. मीळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी […]

अधिक वाचा..