शिवसेनेचा राज्यव्यापी संवाद दौरा; डॉ. श्रीकांत शिंदे २२ जिल्हे, १०० हून अधिक मतदारसंघ पिंजून काढणार

मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा Dr. Shrikant Shinde यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा समावेश […]

अधिक वाचा..

कोकण महाराष्ट्राच्या विकासाचा कणा! दादांची विकासदृष्टी पुढे नेणार; सुनेत्रा पवार

रोहा: “कोकण म्हणजे साक्षात देवभूमी असून इथल्या लोकांनी कष्टाने ही भूमी घडवली आहे. कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे,” असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले. रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत विविध विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादा नेहमी कोकणाची […]

अधिक वाचा..

सोमनाथ मंदिर पुनर्बांधणीवरून राजकारण तापले, मोदीजींचा संबंध तरी काय; अनंत गाडगीळ

मुंबई: गुजरातमधील पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असताना इतिहासाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते यांनी भाजप आणि पंतप्रधान यांच्यावर उपरोधिक टीका करत, “सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीशी मोदीजींचा संबंध तरी काय?” असा सवाल उपस्थित केला आहे. गाडगीळ यांनी सांगितले की, ७५ वर्षांपूर्वी गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनादरम्यान यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीची कल्पना मांडली होती. त्यानंतर ही जबाबदारी […]

अधिक वाचा..

भरती प्रक्रियेतील नव्या सुधारणांवरून राज्यात वाद; सामाजिक प्रतिनिधित्व धोक्यात येण्याची भीती

मुंबई: राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या “भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा” धोरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विविध सामाजिक संघटना, अभ्यासक आणि बहुजन प्रतिनिधींनी या सुधारणांमुळे प्रशासनातील सामाजिक प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारकडून प्रशासन अधिक कार्यक्षम, वेगवान आणि एकसंध करण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संवर्गांचे विलिनीकरण, संयुक्त गट […]

अधिक वाचा..

पश्चिम बंगालमध्ये मोदी-शहा यांची रणनीती यशस्वी; जनतेने विकासाला कौल दिला; एकनाथ शिंदे

नवी दिल्ली: पंतप्रधान Narendra Modi यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केली. शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम आहे. स्वतंत्र […]

अधिक वाचा..

सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात; मीरा भाईंदर जमीन प्रकरणावरून सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला. कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी नागपुरात केला. […]

अधिक वाचा..

भाजप देशभर दंगली घडवण्याचा कट रचत आहे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून पश्चिम बंगालमधील दंगली ही त्याची सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील Tilak Bhavan येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, पाच […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 92.09 टक्के, मुलींची बाजी

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अपयशी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, […]

अधिक वाचा..

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून, राज्य विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष To Lam यांच्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यानिमित्त आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिएतनामी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस […]

अधिक वाचा..

वादळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग; सर्वजण सुखरूप

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी ठाणे ग्रामीण परिसरातील खराब हवामान आणि वादळाचा फटका बसला. मात्र, पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर मागे वळवून जुहू येथील पवनहंस हेलिपॅडवर सुरक्षित लँडिंग केले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली नसून शिंदे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे हे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लग्नसमारंभासाठी […]

अधिक वाचा..