बारामतीत विकासकामांची धडाकेबाज पाहणी; पार्थ पवारांचा ‘सरप्राइज’ दौरा, अजितदादांच्या कार्यशैलीची पुनरावृत्ती

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यशैलीची झलक पुन्हा एकदा बारामतीकरांना पाहायला मिळाली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाहणी केली. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. दौऱ्यात पार्थ पवार यांनी थेट कामांच्या ठिकाणी भेट देत प्रगतीचा […]

अधिक वाचा..

राजधर्मावरून राज्यात खळबळ! शिवाजी महाराज–टिपू सुलतान वाद आणि मंदिर प्रकरणाने वाढले राजकीय तापमान

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन वेगवेगळ्या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि टिपू सुलतान (Tipu Sultan) यांच्यावरील वक्तव्यावरून वाद निर्माण झाला, तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मंदिर दर्शनावरून नवीन राजकीय आणि सामाजिक चर्चा पेटली आहे. या दोन्ही घटनांमुळे “राजधर्म” आणि राज्यकर्त्यांची जबाबदारी हा […]

अधिक वाचा..

‘माजी’ करण्याची भाषा करणाऱ्यांवर शिवसेनेचा जहरी वार; व्यंगचित्रातून गणेश नाईक यांच्यावर निशाणा

मुंबई: शिवसेना पक्षाने सोशल मीडियावरून वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या नाईक यांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेने हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले असून ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आणि निर्णयांवर […]

अधिक वाचा..

पुष्पगुच्छ नको, महापौर निधीस हातभार लावा; महापौर रितू तावडे यांचे आवाहन

मुंबई: मुंबईकरांनी स्वागतासाठी शाल–पुष्पगुच्छ आणण्याऐवजी महापौर निधीस आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे. महापौर म्हणून मिळणारे संपूर्ण मानधन स्वतः महापौर निधीस देत असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही या निधीस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन केले. या निधीतून दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना […]

अधिक वाचा..

‘जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही’; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर घणाघात

मुंबई: अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या तसेच संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करत राहणार असल्याचा ठाम इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, काही भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका व्यापार करारावरून देशात खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीती, सरकारकडून अद्याप तपशील गोपनीय

मुंबई: भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय आणि आर्थिक चर्चांना उधाण आले आहे. केंद्र सरकारने या कराराला ‘ऐतिहासिक’ आणि ‘रणनीतिक’ असे संबोधले असले, तरी कराराचा अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. संसदेला विश्वासात न घेता आणि शेतकरी संघटनांशी सखोल चर्चा न करता करण्यात आलेल्या घोषणेमुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald […]

अधिक वाचा..

एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच; ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून प्रवाशांना अभेद्य संरक्षण

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’चा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि तंत्रज्ञानसज्ज होणार आहे. दहशतवादी व समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून बसस्थानकांपासून विभागीय कार्यालयांपर्यंत डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे […]

अधिक वाचा..

अल्पसंख्याक निधी पारदर्शकपणे वाटा; चुकीच्या प्रमाणपत्रांवर कठोर कारवाई; सुनेत्रा पवार यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकापर्यंत समप्रमाणात आणि पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे. विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व उत्तरदायी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे […]

अधिक वाचा..

आरक्षणासाठी आयोग स्थापन; बंजारा समाजाच्या उन्नतीस सरकार कटिबद्ध

संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराजांसह सर्व संतांना वंदन […]

अधिक वाचा..

शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान? उद्धव ठाकरे गप्प का? भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा सवाल

मुंबई: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजपाने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. “शिवरायांचा अवमान होत असताना तीन दिवस उलटूनही उद्धव ठाकरे गप्प […]

अधिक वाचा..