नंदनवनमध्ये राजकीय नव्हे तर ‘कलारसिक’ भेट; राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे आज एका वेगळ्या आणि लक्षवेधी भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र ही भेट केवळ राजकीय नव्हती, तर कलारसिकतेचा सुंदर संगम ठरली. नंदनवन बंगल्यात लावण्यात आलेली मुंबईतील हेरिटेज वास्तूंची दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहताना राज ठाकरे अक्षरशः भारावून गेले. […]

अधिक वाचा..

मुंबईत भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी; महापौर रितू तावडे यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून यावर्षीच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्याची विनंती केली आहे. मुंबईत दररोज लाखो पर्यटक आणि व्यावसायिक ये-जा करत असतात. शहरात प्रवेश करतानाच मुंबईची वेगळी आणि आकर्षक ओळख निर्माण व्हावी, तसेच जागतिक […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचा उपक्रम

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे स्व. अरुण सरनाईक यांच्यावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’ माहितीपटाचे विशेष प्रदर्शन मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्व. अरुण सरनाईक यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या ‘पप्पा सांगा कुणाचे…’ या विशेष माहितीपटाचे प्रदर्शन येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञानाद्वारे वापर करून शेतमाल विक्रीची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना जलद उपलब्ध करून द्यावी; जयकुमार रावल

मुंबई: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फळे, भाजीपाला व इतर शेतमालाची उपलब्धता तसेच खरेदी-विक्री संदर्भातील प्रत्येक क्षणाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहचण्यासाठी सक्षम यंत्रणेसाठी येणाऱ्या काळात आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. शेतकऱ्यांना देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारातील माहितीच्या आधारे शेतमाल विक्रीबाबत अचूक आकलन होऊन स्पर्धात्मक दरात […]

अधिक वाचा..

राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या; शिवेंद्रसिंहराजे भोंसले           

मुंबई: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस […]

अधिक वाचा..

चौलमध्ये आशापुरी–हिंगुळजा मंदिर वाद पेटला; वनजमिनीवरील अतिक्रमणाचा आरोप

रायगड: रायगड जिल्ह्यातील चौल येथे आशापुरी देवी व हिंगुळजा देवी मंदिर परिसरावरून वाद निर्माण झाला आहे. वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम व मंदिराच्या नामांतराचा आरोप स्थानिक रामवंशी क्षत्रिय समाजाने केला आहे. संबंधित प्रकरणात तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नेमका वाद काय? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आशापुरी देवी व हिंगुळजा देवी या पारंपरिक दैवतांचे […]

अधिक वाचा..

मुस्लीम ५% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक; सरकार अल्पसंख्याकविरोधी; नसीम खान

मुंबई: राज्यातील भाजपा महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला खीळ घालणारा आहे, असा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नसीम खान म्हणाले की, २०१४ साली काँग्रेस आघाडी […]

अधिक वाचा..

शिवप्रेमींची दिलगिरी! भाजपावर हल्लाबोल; टिळक भवन बैठकीत काँग्रेसचा आक्रमक सूर

मुंबई: भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा […]

अधिक वाचा..

सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांनी मौन का सोडलं नाही?

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्तरावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने दिलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) हे दोन्ही रेकॉर्डर भीषण आगीत बराच वेळ राहिल्यामुळे उच्च तापमानाचा गंभीर परिणाम सहन करावा लागला. तरीही तपास यंत्रणेला काही महत्त्वाचा […]

अधिक वाचा..

बारामतीत २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती (पुणे): प्रेमसंबंधातून झालेल्या कथित फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील रुई बयाजीनगर येथे घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे पुण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, बारामती) […]

अधिक वाचा..