पंचायत समित्यांत भाजपला मित्रपक्षांकडूनच धक्का; जुन्नर-मिरज-हवेलीत वेगवेगळी समीकरणे

महायुतीत अंतर्गत तणाव उघड; स्थानिक राजकारणामुळे भाजप सत्तेबाहेर मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली असली तरी काही पंचायत समित्यांमध्ये मित्रपक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजपला धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांत तीन पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत महायुतीतीलच पक्षांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

शिवसेना नाव-धनुष्यबाण वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; पुढील तारीख अद्याप निश्चित नाही

मुंबई शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ यावरून सुरू असलेल्या वादावर Supreme Court of India मध्ये गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. मात्र या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसून पुढील सुनावणीची तारीख नंतर निश्चित करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात Uddhav Thackeray गट आणि Eknath Shinde गट यांच्यातील वादावर दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवाद […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त

मुंबई: महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर कडक ताशेरे ओढले. शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या निकषांवर […]

अधिक वाचा..

२०१४ पासून ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखवणारा व्यक्ती १२ वर्षापासून सत्तेवर, केंद्र सरकारचा हुकूमशाही कारभार

मुंबई: काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यशाळेतून वर्षभरातील पक्ष संघटनेचे कामाकाजाची रुपरेषा ठवरून त्यामार्गाने मार्गक्रमण करण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारविरोधात लढणे, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच काँग्रेसचा विचार अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या कार्यशाळेत मंथन केले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

जनतेचे प्रश्न विचारणे म्हणजे देशाची बदनामी नव्हे; तेच लोकशाहीचे कर्तव्य; ॲड. अमोल मातेले

मुंबई: विरोधी पक्षांनी देशातील जनतेच्या अडचणी, महागाई, बेरोजगारी, गॅस व इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा सरकारच्या धोरणांवर टीका केली की लगेच त्याला “देशाची बदनामी” असे नाव देणे ही सत्ताधाऱ्यांची सोयीस्कर भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे […]

अधिक वाचा..

देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते; एकनाथ शिंदे

मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इस्राईल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकार अत्यंत बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार आणि खरमरीत शब्दात टीका केली. मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील […]

अधिक वाचा..

मुंबईतील विधानभवन, उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रोला बॉम्बची धमकी; सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या […]

अधिक वाचा..

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ […]

अधिक वाचा..

जेवणावरून वाद पेटला अन् सिलिंडरने ठेचून सहकाऱ्याचा जीव घेतला

पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एका कामगाराची गॅस सिलिंडरने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोशी परिसरातील कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पावर जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या घटनेत बालाजी खंदाडे (वय २९) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी प्रदीप गुंडारे (वय ३२) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोशीमधील कुदळे […]

अधिक वाचा..