मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मुंबईतील महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज […]

अधिक वाचा..

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगीतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिरूर तालुक्याने एक गुणी कलावंत गमावला आहे. हरीभाऊ पवार हे सनई वादनातील एक मान्यवर नाव म्हणून ओळखले जात होते. ‘हरि -नाथा ‘ या दोन भांवाच्या नावाने त्यांच्या ताफ्याची ख्याती अनेक […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला कोणताही अधिकार नाही. आधी Bunch of Thoughts आणि Manusmriti जाळा, मग बोला,” असे आव्हान त्यांनी दिले. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपाची विचारसरणी M. S. Golwalkar यांच्या ‘बंच ऑफ थॉट’वर आधारित […]

अधिक वाचा..

पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी कधी? राष्ट्रवादी काँग्रेस चा मोदी सरकारवर हल्लाबोल

महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम हल्ल्याला एक वर्ष उलटूनही हल्लेखोरांना शिक्षा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी या प्रकरणात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

अधिक वाचा..

के.ई.एम. रुग्णालय नामांतरावरून वाद; ‘फलक नव्हे, सुविधा वाढवा’ – अमोल मातेले

मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) चे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मातेले यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “नाव बदलण्याच्या राजकारणाने जनता कंटाळली आहे. केवळ […]

अधिक वाचा..

घराणेशाहीमुळे महिला आरक्षणाला विरोध; नीलम गोऱ्हे यांचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना महिला आरक्षणाबद्दल प्रेम आहे, पण ते पुतना मावशीचं आहे, अशी सडेतोड टीका शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. या दोघींना घराण्याचा वारसा मिळाला आहे. महिला आरक्षणाचा फायदा सामान्य महिलांना मिळणार होता, पण त्याबाबत सुळे आणि शिंदे […]

अधिक वाचा..

काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर घणाघात

मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिंदे म्हणाले, “देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाला लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे.” पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी काँग्रेसवर सडकून टीका […]

अधिक वाचा..

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी करण्याची अंतिम मुदत २३ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून सातत्याने येणाऱ्या विनंत्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या निर्णयानुसार, इच्छुक विद्यार्थ्यांना २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री […]

अधिक वाचा..

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची चिमुरडी हरवल्याची घटना घडली. गर्दीत आई-वडिलांपासून ताटातूट झाल्याने ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती. डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर थरथर—स्वतःचे नाव सांगतानाही तिचा आवाज दाटून येत होता. सकाळच्या सुमारास पाठीवर काळी बॅग असलेली, रडत आणि घाबरलेल्या अवस्थेत एकटी फिरताना ही मुलगी दिसली. […]

अधिक वाचा..

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI) परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बांद्र्यातील आर. डी. नॅशनल कॉलेज येथे 15 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अ.भा.वि.प.च्या मते, तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर येणे ही […]

अधिक वाचा..