मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत चौथ्या रिव्हर्स बायर-सेलर मीटचे आयोजन करण्यात आले आहे. हा आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यक्रम इंडिया एसएमई फोरमच्या सहकार्याने 27 व 28 एप्रिल 2026 रोजी द लीला हॉटेल, अंधेरी, मुंबई येथे पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमातून निर्याताभिमुख एमएसएमई उद्योगांना जागतिक […]

अधिक वाचा..

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे. मंगळवारी वरळी डोम परिसरात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजप महायुतीने मोर्चा काढला होता. ऐन गर्दीच्या […]

अधिक वाचा..

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये “पहिला अधिकार कुणाचा?” हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मात्र, कायद्याच्या दृष्टीने याचे स्पष्ट उत्तर आहे — कोणालाही ‘पहिला हक्क’ दिलेला नाही. कायदा काय सांगतो? भारतातील हिंदू कुटुंबांसाठी लागू असलेल्या हिंदू उत्तराधिकार कायदा 1956नुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर क्लास-1 वारस यांचा […]

अधिक वाचा..

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (वर्किंग नॉलेज) अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन, अखलाख अहमद वाहिद उझमा, अकबर गुलाब शेख, फिरोझ अब्दुल रेहमान खान आणि फैजल खलील शेख […]

अधिक वाचा..

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. गांधी हत्या ही भारतीय संस्कृतीला धरून नसून अहिंसेच्या तत्वांना छेद देणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जैन धर्मातील अहिंसेच्या विचारांच्या विरोधात जाऊन जैन मुनीने असे वक्तव्य करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. गांधी हत्या प्रकरणात […]

अधिक वाचा..

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मुंबईतील महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज […]

अधिक वाचा..

प्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार काळाच्या पडद्याआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगीतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिरूर तालुक्याने एक गुणी कलावंत गमावला आहे. हरीभाऊ पवार हे सनई वादनातील एक मान्यवर नाव म्हणून ओळखले जात होते. ‘हरि -नाथा ‘ या दोन भांवाच्या नावाने त्यांच्या ताफ्याची ख्याती अनेक […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला कोणताही अधिकार नाही. आधी Bunch of Thoughts आणि Manusmriti जाळा, मग बोला,” असे आव्हान त्यांनी दिले. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपाची विचारसरणी M. S. Golwalkar यांच्या ‘बंच ऑफ थॉट’वर आधारित […]

अधिक वाचा..