निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा…

मुंबई: दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे, असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोग आपली कार्यवाही […]

अधिक वाचा..

मुस्लिम समाजाबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसने मुस्लिम समाजातील मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकरित्या शैक्षणिक आरक्षण पाच टक्के देण्याची तरतूद केली होती आता यावर शिंदे – फडणवीस सरकारचे काय म्हणणे आहे हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. राज्यातील ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक […]

अधिक वाचा..

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, जाणून घ्या…

औरंगाबाद: अखेर जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण..? जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) देवेंद्र फडणवीस: नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली 2) संदिपान भुमरे: औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) 3) अतुल सावे: जालना, बीड 4) अब्दुल सत्तार: हिंगोली 5) […]

अधिक वाचा..

फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे?

मुंबई: राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. टिळक भवन येथे प्रसार […]

अधिक वाचा..

बदलीसाठी दबाव आणणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अन्यथा…

मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी अद्यापही रुजू झालेले नाहीत. तसेच काही अधिकारी हे त्यांच्या सोयीनुसार त्यांना पदस्थापना मिळावी यासाठी विविध माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही निर्दशनास आले आहे. परंतु अशा अधिकारी- कर्मचा-यांवर यापुढे कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता जे अधिकारी बदलीच्या अथवा पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत, अशा अधिका-यांना तात्काळ […]

अधिक वाचा..

देशात चित्ते आल्याने लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का?

मुंबई: तुमच्या माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे… ते वाढावेत, पशूधन वाढावे हेही ठीक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे ते सांगा… तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी […]

अधिक वाचा..

जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांविरोधात; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी संधी…

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौर्‍यावर असून त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर पवार साहेबांना ताकद दिली होती याची आठवणही […]

अधिक वाचा..

CM शिंदेनी घेतलेल्या बैठकीबाबत खासदार कोल्हेंनी व्यक्त केला खेद…

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरुर हवेली मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत एक बैठक घेतली. त्यानंतर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी या बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवा पायंडा पाडत आहेत. त्यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाबाबत बैठक घेतली. मात्र या बैठकीला लोकांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रण नसल्याची खंत खासदार कोल्हे यांनी व्यक्त […]

अधिक वाचा..

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का…

मुंबई: बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; महाराष्ट्राचा कारभार मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावरच…

मुंबई: महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा 2 लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झालेले आहे. मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..