औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी गावात दोन सख्ख्या भावांनी क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती, आता पुन्हा पैशाच्या व्यवहाराच्या वादातुन मित्राच्या वडिलांचा भर रस्त्यावरच चाकूने भोसकून खून केल्याचा घटना म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास टाऊन हॉल परिसरात घडली असून कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे तर अजय काशीनाथ चव्हाण (२५, रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत कैलास यांच्या दोन्ही मुलांसोबत आरोपी अजय चव्हाण याची मैत्री आहे. कैलास वाकेकर हे रंग देण्यास इतर प्रकारचे काम करून उदारनिर्वाह करीत होते. तर अजय चव्हाण हा सुद्धा रोजंदारीवर काम करीत होता. त्याचा कामावर जाण्या-येण्याचा मार्ग टाऊन हॉल परिसरातुन होता. शुक्रवारी तो घराकडे जात असताना रस्त्यावरच कैलास वाकेकर यांच्यासोबत पैशाच्या व्यवहारातुन दोघात वाद सुरू झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अजयने त्यांना रस्त्यावर पाठीमागून चाकूने भोसकले. त्यात कैलास रस्त्यावरच कोसळले. तेव्हा घटनास्थळावर आरोपी अजय यासही बेदम मारहाण करण्यात आली.
गंभीर जखमी कैलास यांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी मृत घोषीत केले. त्यानंतर जखमी आरोपीलाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.