कृत्रिम बुद्धिमत्ता! भारताच्या युवा शक्तीच्या सक्षमीकरणाचे साधन

महाराष्ट्र

मुंबई: २१ वे शतक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे शतक मानले जाते. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) असून, ती शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, संरक्षण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवत आहे.

शिवसेना पक्षाचे मिडिया समन्वयक दिनेश शिंदे म्हणतात, “भारतासारख्या युवा लोकसंख्येच्या देशासाठी AI ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून राष्ट्रीय सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरू शकते.”

शिंदे यांच्या मते, भारतात सुमारे ६५% लोकसंख्या ही ३५ वर्षांखालील आहे, जी युवा पिढी नवकल्पक, तंत्रज्ञान-साक्षर आणि परिवर्तन स्वीकारण्यास तत्पर आहे. AI च्या माध्यमातून रोजगार, उद्योजकता, शिक्षण, आरोग्यसेवा, शेती आणि प्रशासन क्षेत्रात मोठे बदल घडवता येऊ शकतात.

ते पुढे म्हणाले, “AI आधारित प्रणाली शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकतात, वैद्यकीय निदान जलद करतात आणि ऑनलाइन शिक्षण व स्मार्ट मूल्यांकनाद्वारे शिक्षण अधिक समावेशक व परिणामकारक बनवतात.”

AI च्या प्रगतीबरोबर काही आव्हानेही आहेत – रोजगार असुरक्षितता, डेटा गोपनीयता, तांत्रिक विषमता आणि नैतिक प्रश्न. यावर मात करण्यासाठी धोरणे, कौशल्य प्रशिक्षण आणि नैतिक चौकट गरजेची असल्याचे ते सांगतात.

शिंदे यांनी भविष्यासाठी मार्गदर्शन करत म्हणाले, “शालेय व उच्च शिक्षणात AI समावेश, युवा कौशल्य विकास, संशोधन व नवकल्पना प्रोत्साहन आणि मानव-केंद्रित AI या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.”

त्यांचे म्हणणे आहे की, “AI ही भारतासाठी केवळ संधी आहे; योग्य दिशेने प्रशिक्षित व सक्षम झालेली युवा पिढी याचा उपयोग करून देशाला आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या सशक्त बनवू शकते.”