सरकारचा ऐतिहासिक निर्णय, शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ

महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय  

मुंबई: राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेततळे, विहीर बांधकाम किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या माती आणि खडीवर (गौण खनिज) रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा

शेततळे, विहीर बांधकाम आणि शेत रस्त्यासाठी आवश्यक असलेली माती आणि खडी मोफत मिळणार!

गावतळी, पाझरतलाव, बंधाऱ्यातील गाळ शेतात वापरण्यास मोकळीक

पाणंद रस्ते तयार करण्यासाठीही रॉयल्टी माफ

शेतकऱ्यांना अर्ज फी आणि रॉयल्टी भरावी लागणार नाही.

शेतकऱ्यांना स्वखर्चाने माती, खडी, गाळ वाहून नेण्याची परवानगी मिळणार

घरकूल लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा

घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना विहीर आणि घर बांधण्यासाठी गौण खनिज मोफत मिळणार

ग्रामपंचायत, नगरपालिका आणि सरकारी बांधकामांसाठीही माती-खडीचा वापर शक्य

ठेकेदारांकडून रॉयल्टी वसूल होणार

ग्रामपंचायत व नगरपालिका बांधकामांमध्ये रॉयल्टी मूळ अंदाजपत्रकात समाविष्ट आहे

तहसीलदारांनी ठेकेदारांच्या बिलातून रॉयल्टी वसूल झाल्याची खात्री करावी

शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा 

शेततळे, शेतविहिरी, पाझरतलाव, महसुली नाले, बंधारे बांधकाम, लघुसिंचन तलावांचे खोलीकरण व सरळीकरण

पूरनियंत्रण उपाय व पूरहानी थांबवण्यासाठी खोलीकरण योजनांतर्गत मोफत माती आणि खडी

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गतही लाभ

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा.

शेतीसाठी हवी असलेली माती आणि खडी आता रॉयल्टी मुक्त