संभाजीनगर: भारतातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये लोक त्यांच्या मालमत्तांवरून भाड्याने देऊन चांगली कमाई करत आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही, तर मोठे सेलिब्रिटी देखील त्यांचे अपार्टमेंट्स, बंगले भाड्याने देऊन लाखोंमध्ये कमवत आहेत.
पण, थांबा.
तुम्ही मालमत्ता भाड्याने देत आहात ना
तर ‘1963 चा कायदा’ जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
भाडेकरू बनू शकतो मालक
होय 1963 च्या मर्यादा कायद्यानुसार, जर एखाद्या भाडेकरूने सलग 12 वर्षे कोणतीही अडथळा न येता मालमत्तेवर ताबा ठेवला आणि घरमालकाने त्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही, तर भाडेकरू त्या मालमत्तेवर मालकी हक्काचा दावा करू शकतो.
यालाच “प्रतिकूल ताबा” (Adverse Possession) असे म्हणतात.
कायद्यानुसार नेमकं काय घडत
मालकाने 12 वर्षे मालकी हक्क सांगितला नाही
भाडेकरूने तोपर्यंत ताबा कायम ठेवला
तर भाडेकरू मालकी मिळवू शकतो.
सरकारी मालमत्तेवर देखील हक्क
होय सरकारी मालमत्तेसाठी ही मुदत 30 वर्षांची आहे. जर एखादा व्यक्ती सरकारी जागेत 30 वर्षे सतत राहत असेल, तर तो त्या मालमत्तेवरही दावा ठोकू शकत.
घरमालकांनी काय करावे
भाडेकरूंसोबत लेखी करार करा
करारात भाडे व अटी स्पष्ट नमूद करा
वेळोवेळी मालमत्तेवर ताबा दाखवा
भाडेकरूने नियमभंग केला तर लगेचच कायदेशीर कारवाई करा.
तर मग उशीर कशाचा
तुमच्या मालमत्तेचं संरक्षण आजच सुरू करा! नाहीतर भाडेकरू तुमच्या घराचा “मालक” होईल.