nitin-thorat-award

आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!

शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावचे सुपुत्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री. थोरात यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन), आत्मा पुणे आणि पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. कै. वसंतरावजी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये उसतोड मजुर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला 12.67 लाखांचा गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): उसतोड मजुर पुरविण्याचे आमिष दाखवत शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून तब्बल 12 लाख 67 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्याशी लेखी करार असल्याचे भासवत शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर उसतोड मजूर न पुरविता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील तिघांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..
warude-murder-case

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यानेच कोयत्याने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वरूडे (ता. शिरूर) येथील रानमळा परिसरात राहणारे बाळासो बबन तांबे (वय […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृत बाळासाहेब तांबे हे वरुडे येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करत होते. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी […]

अधिक वाचा..

Video: गुनाट गावातील गारपिटीनंतर गुणवंतवाडी सात दिवस अंधारात; शेतकरी त्रस्त…

शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट, निर्वी आणि कोहकडेवाडी येथे 1 एप्रिल रोजी गारपीट झाली होती. त्यानंतर गुनाट गावातील गुणवंतवाडी येथे विजेचे खांब पडल्याने विजेचा खोळंबा झाल्याने सलग सात दिवस ग्रामस्थांना मोठया अडचनींचा सामना करावा लागला. तसेच वीज नसल्यामुळे सोमवार (ता. ६) रोजी सायंकाळी सुमारे ७:३० च्या सुमारास येथील शेतकरी हनुमंत गव्हाणे […]

अधिक वाचा..

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; जयकुमार रावल

मुंबई: बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक […]

अधिक वाचा..

बळीराजा कायद्यांसाठी नाही; कायदे बळीराजासाठीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड: “कायदे शेतकऱ्यांसाठी असतात; शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले,” अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली.नांदेड-लोहा येथे पार पडलेल्या भव्य शेतकरी अधिवेशन व पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी हित, विकासकामे आणि विरोधकांवर जोरदार टीका करत दमदार राजकीय संदेश दिला. शिंदे […]

अधिक वाचा..
jalinder-bhadale

पुणे जिल्ह्यात ऊसाचे पाचट जाळताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू…

पुणे : पारगाव (ता. दौंड) येथे ऊसाच्या शेतातील पाचट जाळताना एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऊसाचे पाचट पेटवताना आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्याला त्या आगीतून बाहेर पडता न आल्याने मृत्यू झाला आहे. जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी (ता. 22) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या […]

अधिक वाचा..
bhumi-abhilekh-shirur

मोठा कट उघड! शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील पारोडी येथील वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्यासाठी तब्बल सहा दशकांपूर्वीच्या एकत्रिकरण नोंदींमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या व शिक्के तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एकूण १३ जण आरोपी आहेत. विशेष म्हणजे या कथित […]

अधिक वाचा..

१ कोटीच्या खंडणीसाठी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या निरपराध शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले असून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. असा घडला थरार शनिवारी तुकाराम गव्हाणे मका विक्रीचे पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते. रात्री […]

अधिक वाचा..