Shirur Police Station

उरळगाव येथे ऊस, आंबा, नारळाची झाडे पेटविल्याने आर्थिक नुकसान

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) उरळगाव (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीने स्वतःच्या शेतातील गवत पेटविताना काळजी न घेतल्याने शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील उसाचे पिक, आंब्याची आणि नारळाची झाडे पेटविल्याने मोठे नुकसान झाले असुन याबाबत संगिता पोपट काळे (वय ३७) रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन दत्तात्रय शंकर बांडे या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय बांडे यांनी (दि 31) मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास स्वतःच्या शेतातील गवत पेटविल्याने जमिन गट नं.77/2 मध्ये असणाऱ्या शेतातील ऊस, तसेच नारळ आणि आंब्याची झाडे जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच शेजारील अर्जुन विठोबा काळे यांचे चिकुच्या झाडाला आग लागून नुकसान झाले आहे. शिरुर पोलिसचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.