शिरुर; ग्रामीण भागातील हजारो निराधार महिलांचा आधार ठरतंय बंधन आणि ITC मिशन सुनहरा कल

शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ITC मिशन सुनहरा कल अंतर्गत ‘बंधन संस्था’ निराधार महिलांना आधार देण्यासाठी पुढे आली असुन काही महिलांच्या घरातील एक वेळेची चुल पेटत नाही अशा महिलांना छोटे छोटे व्यवसाय जसे की कपडे, किराणा किट, चप्पल जुते, बांगडी, भाजी पाल्याची गाडी, कॉस्मिटिक सामान इत्यादी सामानाचे वाटप करण्यात आले.

यावेळी महिलांना मार्गदर्शन करतांना शबांना पटेल म्हणाल्या की, महिलांनी नव्या ताकदीने व्यवसाय उभा करा. प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करा. कधीकधी आपल्या घरातील व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु ‘बंधन’ हि सेवाभावी संस्था हि तुमच्या पाठीशी उभी असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी मलठण गावचे सरपंच विलास थोरात, म्हसे गावचे सरपंच जालिंदर मुसळे, सामाजिक कार्यकर्ते काळुराम पवार, मलठण गावच्या सीआरपी शबाना पटेल, अनिता अभंग, बंधनचे एरिया कॉर्डिनेटर संजीब बावरी, रजत मंडळ, अंमल मंडळ, महादेव गायकवाड आणि लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी

शिरूर! तक्रार मागे घे, नाहीतर पुन्हा जिवंत सोडणार नाही

घोड धरणातुन बेकायदेशीर वाळु उपसा सुरुच; प्रशासन हतबल…?