सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे, आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, जांबुत, वडनेर, पिंपरखेड, काठापूर, फाकटे, निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, सविंदणे , शरदवाडी या परिसरात आज (मंगळवार) जोरदार पाऊस झाला.
पिके पाण्याअभावी धोक्यात असताना कुकडी नदीला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. सलग तीन दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने तूर्तास तरी जमिनीची तहान भागली असून जनावरांचा चारा आणि पिके बहरणार आहेत. या पावसाने विहिरी आणि कूपनलिकांची पाण्याची पातळी वाढू शकते, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
पावसामुळे काढणीला आलेले डाळिंब पिकाची मात्र शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. पाऊस पडल्यानंतर बुरशी, किड रोग निवारणासाठी लगेचच औषधांची फवारणी करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या उकाड्याने त्रासलेले नागरीक पावसाच्या ओलाव्याने थंडावले आहेत.
शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…
Video: पेट्रोल पंपावर फोनची रिंग वाजली आणि दुचाकी पेटली…
दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…