टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधारांवर मकोकाअंतर्गत कारवाईचा विचार; एकनाथ शिंदे

मुंबई: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा संघटित टोळीचा […]

अधिक वाचा..

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील गुरुनानक स्वीट मार्टमधून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळी शोरूममध्ये […]

अधिक वाचा..

नवे पोलीस निरीक्षक, जुन्याच समस्या राहणार का? शिरूर तालुक्यात ‘ॲक्शन’ची प्रतीक्षा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या तीनही पोलीस ठाण्यांमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, गुन्हेगारीवर आळा बसेल आणि अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी केवळ अधिकारी बदलून परिस्थिती बदलेल का, हा प्रश्नही उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध साहित्य […]

अधिक वाचा..

वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार ठाम असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मराठी न येणाऱ्या अमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षा व टॅक्सी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या वेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार […]

अधिक वाचा..

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मुंबईतील महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज […]

अधिक वाचा..

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे बंडखोरांवर कारवाईचे संकेत; तीन नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस

गट स्थापनेत सहकार्य न केल्याचा ठपका; उत्तर न दिल्यास अपात्रतेची प्रक्रिया सुरू होणार मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील तीन बंडखोर नगरसेवकांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. संबंधित नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस देण्यात आली असून समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत […]

अधिक वाचा..

नागपुरात ओबीसींचा एल्गार; जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी, स्फोटप्रकरणी कारवाईचा इशारा

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत आज नागपूरच्या संविधान चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनगणना अर्जात ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्यास समाजाचे मोठे नुकसान […]

अधिक वाचा..

आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: ‘आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने’चा लाभ गरजू रुग्णांना नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरू आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णांना आरोग्य योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या काळात सभागृहात मांडला. ते म्हणाले, चंद्रपूर […]

अधिक वाचा..