वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने आता स्वच्छता मोहिमेची धुरा हाती घेतली आहे. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर पक्षाचे पदाधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, मंगळवारी वरळी कोळीवाडा आणि समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या अभियानात […]

अधिक वाचा..

गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का; राज्यातील पहिलीच कारवाई

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. राज्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का लावण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..

शिक्रापुर मध्ये एका धोकादायक इसमावर ‘एमपीडीए’ ची कारवाई; अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी 

शिरुर (तेजस फडके): सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या शिक्रापुर येथील धोकादायक इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याला ताब्यात घेऊन अकोला […]

अधिक वाचा..

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर प्रशासनाने कारवाई केली आहे. रेश्मा पारधी असे संबंधित सेविकेचे नाव असून, त्यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे. रेश्मा पारधी यांनी अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवत व्हिडिओ […]

अधिक वाचा..

पुणे; दूध भेसळ प्रकरणात कारवाईचा फास आवळला; ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर १४ आरोपी यापुर्वीच येरवडा कारागृहात

मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला आणखी वेग आला आहे. दूध भेसळ प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपी क्रमांक १ ते ११ तसेच मुख्य आरोपी सुशांत बबनराव हिंगे यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच १४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या […]

अधिक वाचा..

टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधारांवर मकोकाअंतर्गत कारवाईचा विचार; एकनाथ शिंदे

मुंबई: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा संघटित टोळीचा […]

अधिक वाचा..

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील गुरुनानक स्वीट मार्टमधून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळी शोरूममध्ये […]

अधिक वाचा..

नवे पोलीस निरीक्षक, जुन्याच समस्या राहणार का? शिरूर तालुक्यात ‘ॲक्शन’ची प्रतीक्षा

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या तीनही पोलीस ठाण्यांमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, गुन्हेगारीवर आळा बसेल आणि अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी केवळ अधिकारी बदलून परिस्थिती बदलेल का, हा प्रश्नही उपस्थित केला जात […]

अधिक वाचा..

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध साहित्य […]

अधिक वाचा..

वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..