12 फेब्रुवारी भारत बंद! कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांचा देशव्यापी संप

बँका, वाहतूक सेवांवर परिणामाची शक्यता नवी दिल्ली: देशातील विविध कामगार आणि शेतकरी संघटनांनी आज (12 फेब्रुवारी) भारत बंदचे आवाहन केले आहे. 10 केंद्रीय ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापारी करार, मनरेगातील बदल आणि इतर धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या बंदमुळे बँका, काही सरकारी कार्यालये, सार्वजनिक […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या अनुदान घोटाळ्यात मुख्य आरोपीला अटक, महसूल विभागात खळबळ

मुंबई: शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सुमारे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे.पैठणकर हा घनसावंगी तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होता. महाघोटाळ्याची […]

अधिक वाचा..

बार्शीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा! विकासकामे व शेतकऱ्यांचा पहिला हक्क

सोलापूर: राज्याच्या तिजोरीवर सर्वप्रथम अधिकार शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेत त्यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेल्या योजनांचा प्रवाह अखंड राहील, कोणतीही योजना बंद होणार नाही. सभेत त्यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या कामाची […]

अधिक वाचा..

२५ कोटींचा अतिवृष्टी अनुदान महाघोटाळा! सरकारी बाबूच बनले ‘शेतकरी’, ३१ जणांना अटक

जालना: नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेली सरकारी तिजोरीच लुटल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार करण्यात आल्याप्रकरणी ३१ आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घोटाळ्यात चक्क तलाठी, तहसील कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा सहभाग असल्याने महसूल विभागात […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई गावच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; राधाकृष्ण विखे पाटील साधणार शेतकऱ्यांशी संवाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कान्हूर मेसाई गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आज (दि. 4) रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील शेतकरी बांधव आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट चर्चा होणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. […]

अधिक वाचा..

पीएम किसान योजना! 22 व्या हप्त्यापुर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष 22ऱ्या हप्त्याकडे लागले असून, हा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रोहित्र चोरी सुरुच; प्रशासन झोपेत, शेतकरी उघड्यावर!

शिरुर (नितीन थोरात): शिरुर तालुक्यातील आमदाबाद परिसरात पुन्हा एकदा वीज रोहित्र चोरीचा प्रकार घडला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. काही दिवसांपुर्वी याच गावात तीन रोहित्र फोडले गेले होते. तरीही एकही आरोपी जेरबंद न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढतच आहे. तालुक्यात रोहित्र चोरी संघटित टोळीमार्फत सुरु असलेले खुले आव्हान बनले आहे. ऐन शेतीच्या हंगामात […]

अधिक वाचा..

PM Kisan चा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू, नोंदणी कुठे आणि कशी करायची औरंगाबाद: केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे बंद झाला होता.आता अशा शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे. कागदपत्रातील चुका आधार-बँक लिंक नसणे जमिनीच्या नोंदीतील नावातील तफावत वारसाहक्क किंवा मालकी हस्तांतरण न झालेले प्रकरण या सर्व कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने नव्याने […]

अधिक वाचा..

शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

राज्यातील भाकड जनावरांना घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली जाते, त्यांच्याकडून पैसे वसूल करणारी टोळी सक्रीय नागपूर: राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावर विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली टोळ्या तयार झाले आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. […]

अधिक वाचा..