दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासन उचलणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुबार पेरणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च आता जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयानुसार, बियाणे न उगवल्यास किंवा पीक पूर्णपणे वाया गेल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत नवीन बियाणे उपलब्ध […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, नरेंद्र […]

अधिक वाचा..

घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली. चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त […]

अधिक वाचा..

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकरी संकटात; मोशी दुर्घटनेतील जबाबदारांवर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन महत्त्वाच्या जनहिताच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले. विदर्भातील निकृष्ट व बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा मुद्दा उपस्थित करत दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे […]

अधिक वाचा..

महागाई, नोकरभरती आणि शेतकरी प्रश्नांवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील वाढती महागाई ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा आखाती युद्धामुळे नसून राज्य सरकारच्या चुकीच्या आणि दिशाहीन धोरणांचा परिणाम असल्याचा घणाघात माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी महागाई, रखडलेली नोकरभरती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. महागाईसाठी प्रत्येकवेळी आखाती युद्धाला जबाबदार धरण्यावर टीका […]

अधिक वाचा..

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केला. या योजनेतील १७ जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत […]

अधिक वाचा..

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून केळी उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते Jayant Patil यांनी केली आहे. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये जयंत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ प्रशासकीय पातळीवर प्रलंबित

कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारून शेतकरी हैराण    पाबळ (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळख) महसूल आणि कृषी विभागाच्या लालफितशाहीत अडकले आहेत. शासकीय कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी हा फार्मर आयडी अत्यंत अनिवार्य असताना, तो महसूल प्रशासनाकडे प्रलंबित (Pending) असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना शेती खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ‘शिवसन्मान […]

अधिक वाचा..

द्रुतगती चलन भरूनही मोजण्या रखडल्या; शिरूरमधील शेतकऱ्यांचा संताप, बावनकुळे यांना सवाल

शिरूर (अरुणकुमार मोटे): द्रुतगती चलन भरूनही महिनाभरात मोजणी पूर्ण होणे अपेक्षित असताना शिरूर तालुक्यात सहा-सहा महिने उलटूनही मोजण्या होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल उपस्थित केला आहे. नियमानुसार द्रुतगती चलनाच्या प्रकरणात एका महिन्यात, तर नियमित चलनासाठी तीन महिन्यांत […]

अधिक वाचा..