झेपत नसेल तर गृहमंत्रीपद सोडा! महाराष्ट्राची अब्रू वेशीवर; जनतेच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका

मुंबई: बदलापूरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सरकार गुन्हेगारांसमोर हतबल झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले […]

अधिक वाचा..

पडळकर-आव्हाड नाही ‘त्या’ व्यक्तीवर कारवाई करा, गृहमंत्र्यांची पात्रता

मुंबई: विधानभवनाच्या लाॅबीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले. पडळकर यांचे समर्थक कार्यकर्ते हृषिकेश टकले आणि आव्हाडांचे मुख्य कार्यकर्ते नितिन देशमुख यांच्यात तूफान हाणामारी झाली. पडळकर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली तर आव्हाड हे संतापले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मोठी मागणी केल्याने ट्विस्ट आला आहे. […]

अधिक वाचा..

गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा; नसीम खान

अमित शाह व भाजपा विरुद्ध भव्य निषेध मोर्चा  मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या लोकांसोबत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य […]

अधिक वाचा..

वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार; अजित पवार

मुंबई: विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्रसरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे. कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पुढील दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी वैधानिक विकास मंडळाचे तातडीने पुनर्गठन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही […]

अधिक वाचा..

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा…

मुंबई: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते दिसत नाही. लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी आता सरकारकडून मीडियावर दबाव आणला जात आहे आणि दुसरीकडे लाठीहल्ला झालाच नाही, असे फडणवीस निर्लज्जपणे सांगत आहेत, असा घणाघाती हल्ला […]

अधिक वाचा..

कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या…

मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात […]

अधिक वाचा..

राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल?

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

गृहमंत्र्याला जाब कोण विचारणार?

मुंबई: निषेध, आंदोलने, पत्रके यांना धार तेव्हाच येईल, जेव्हा माध्यमात शिंदे-फडणवीस यांना बहिष्कृत केले जाईल. उठसूठ फालतू विषयावर ट्विट करणाऱ्या प्येमचे या विषयावर काहीही ट्वीट नाही. गृहमंत्र्याला घेराव घालण्याचे आंदोलन हवे. कायदा-सुव्यवस्थेची राज्यात वाट लागली आहे. भाजपशी संबंधित वार्ताहर हे खासगी भानगडीत पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत गैरवापर करुन नको ते गुन्हे दाखल करुन घेत आहेत. गृह […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, […]

अधिक वाचा..

माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या पत्नीचे निधन

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील विजयमाला बापूसाहेब थिटे (वय ९०) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विजयमाला या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व खासदार कै. बापूसाहेब थिटे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक राजेंद्र थिटे व धनंजय थिटे यांच्या त्या मातोश्री होत.

अधिक वाचा..