महायुती सरकारवर नैतिकतेचा प्रश्न; झिरवाळांच्या VDO प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी

मुंबई: महायुती सरकारमधील कथित अनैतिक वादांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी झिरवाळ यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी! महायुतीला ६ जागांचा फायदा, शरद पवारांच्या उमेदवारीकडे लक्ष

मुंबई: येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. संख्याबळ पाहता यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता असून, सातपैकी सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. […]

अधिक वाचा..

कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मधून महायुतीचा उमेदवार हद्दपार 

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असतानाच मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार करणा-या भाजप -शिवसेना महायुतीला कुर्ल्यातील वाॅर्ड क्रमांक १६७ मध्ये उमेदवारच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे . कुर्ला पश्चिम येथील वाॅर्ड क्रमांक १६७ हा ओबीसी महीलांसाठी राखीव आहे.या मतदार संघातून काॅग्रेस ,समाजवादी पार्टी,शिवसेना उबाठा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच अपक्ष […]

अधिक वाचा..

सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड […]

अधिक वाचा..

महायुतीचं वाढणार टेन्शन! भाजपा- शिंदेंची सेना आमने-सामने

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल. मात्र, त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत’ अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदाराकडून मित्रपक्षाबद्दलच वापरली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये मित्रपक्षालाच लक्ष्य करण्याचा आमदाराचा मानस आहे. याचा फटका महायुतीला […]

अधिक वाचा..

महायुतीत निधीवरून नवा वाद

पुणे: राज्यात महायुती सरकारमधील अंतर्गत कुरघोडी आणि सत्तेतील भागीदारांमधील नाराजीच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता नगरविकास खात्यातील मोठ्या रकमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे. यामुळे फडणवीस यांनी शिंदे यांच्या निवडक पद्धतीने आणि भरभरून निधी खर्च […]

अधिक वाचा..

महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले; नाना पटोले

सरकारने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले मुंबई: महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक […]

अधिक वाचा..

महायुती सरकारमधील कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातील कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी नाही तर अधिकारी व मंत्री यांचे खिसे भरण्यासाठीच काम करत होता असे विविध घोटाळ्यांवरून दिसत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आला आहे. २५.१२ कोटी रुपयांच्या खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..

महायुती सरकारचा कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण

मुंबई: महायुती सरकारमध्ये कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे प्रकार उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या योजनांमधून पैसा खाऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा उद्योग महायुती सरकारने केला आहे. कापूस साठवणूक बॅग पुरवठ्याच्या घोटाळ्यासारखाच शेतकऱ्यांना बॅटरी स्प्रेअर पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या आशिर्वादाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील अधिकारी व कृषी विभागाने संगनमताने ८०.९९ कोटींच्या खरेदीत […]

अधिक वाचा..

महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची

मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने महाराष्ट्रातील बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे परंतु कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे अशाप्रकारची चर्चा होत असून हे अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे […]

अधिक वाचा..