जनतेच्या जमिनीवर कर्ज नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या नात्यात विकास?

१५ एकरांवर १०० कोटींचं कर्ज? रनाळा ‘गुप्त स्मार्ट सिटी’ झाली आहे का नागपूर: महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहतेय, असं सत्ताधारी वारंवार सांगतात. मात्र ही गंगा नेमकी कुणासाठी आणि कुठे वाहतेय, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रनाळा गावातील १५ एकर जमिनीवर तब्बल १०० कोटी रुपयांचं कर्ज मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय आणि […]

अधिक वाचा..

आमची मुंबई, मराठी मुंबई; लोक चळवळीची गरज

नेते हो, मतभेद असतील तर ते संपवा; मुंबईच्या हिताला प्रथम प्राधान्य द्या! “आमची मुंबई, मराठी मुंबई” हा केवळ नारा न राहता तो लोकचळवळ बनला पाहिजे, अशी अपेक्षा आज मुंबईतील मूळ मुंबईकर व्यक्त करत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईची ओळख, मराठी माणसाचा हक्क आणि शहराचे भविष्य या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. […]

अधिक वाचा..

महायुतीच्या काळात महिला अत्याचारात प्रचंड वाढ, लोकांचे जगणेही झाले धोकादायक

मुंबई: महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपायुतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड गोंधळ आहे. एकनाथ शिंदे व […]

अधिक वाचा..

विजय वडेट्टीवार सक्षम विरोधी पक्षनेते, जनतेच्या प्रश्नांना न्याय देतील; नाना पटोले

मुंबई: राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विरोधी पक्ष नेत्याचे आहे. महागाई, बेरोजगारी यासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, या प्रश्नांवर सरकारला जाब विचारून जनतेला न्याय देण्याची गरज आहे. विजय वडेट्टीवार हे सक्षम विरोधी पक्षनेते असून आपली भूमिका समर्थपणे पार पाडतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा..

विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा, सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही…

मुंबई: पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली. भाजपाप्रणित सरकार जनतेच्या प्रश्नांवर गंभीर नाही. महागाई कमी करण्यासाठी या सरकारकडे कोणतेही धोरण नाही. सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. १०-१५ हजार रुपयांच्या पगारात शहरातील कुटुंबाला […]

अधिक वाचा..

आमदारांना असमान निधी वाटप म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधीवर अन्याय; अंबादास दानवे

मुंबई: राज्यात सरकारकडून विरोधक आमदारांना निधीवाटपातून डावळले त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात आवाज उठविला. तसेच विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे दानवे म्हणाले. विधानपरिषदेच्या आमदार यांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं […]

अधिक वाचा..

लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब […]

अधिक वाचा..

सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा; डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा शिवसेना जिल्हा पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक  सातारा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सामाजिक उपक्रमांनी जनतेला जोडून घ्या. समाजाच्या कामाच्या माध्यमातून आपली प्रतिमा तयार करता येतील. या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करा, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले. आज त्यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे येथे शिवसेना जिल्हा […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित…

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करा मुंबई: काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधींनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचा घातलाय घाट, त्यामुळे विकास कामांची लागतीये वाट

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात काही दिवसांपासुन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनीच्या फंडातुन विकासकामे चालु असुन ती कामे आर्थिक फायद्यासाठी आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला मिळावीत यासाठी राजकीय पुढारी कर्मचाऱ्यांपासुन ते अधिकाऱ्यांपर्यंत सेटिंग लावत आहेत. तसेच स्थानिक गावातील सरपंच ते तालुक्यातील सगळ्यांच लोकप्रतिनिधींनीचे या विकासकामात आर्थिक हितसंबंध असल्याने कामाचा दर्जा मात्र घसरत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. शिरुर […]

अधिक वाचा..