महापौर-उपमहापौर निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

शिवसेना–एमआयएम एकत्र येण्याची शक्यता, गुप्त बैठकींनी चर्चांना उधाण मालेगाव: महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शनिवारी (दि. ७) होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले असून घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी (दि. ५) एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि माजी महापौर तथा एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची […]

अधिक वाचा..

संजय गांधी ते अजित पवार! विमान अपघातांत संपणारी राजकीय कारकीर्द

विमान अपघातांत मृत्यू झालेल्या नेत्यांची भयावह मालिका बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरत असतानाच विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक आणि फ्लाइट अटेंडंट यांचा मृत्यू झाला. विमान अपघातात राजकीय नेत्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून आज सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना प्रचंड […]

अधिक वाचा..

राजकीय वाटचालीत अपार यश! पण अजित पवारांच्या स्वप्नांची पूर्तता होण्याआधीच नियतीचा घाला

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज, स्पष्टवक्ता आणि कामाचा झपाटा असलेले नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या राजकीय प्रवासात अजित पवार यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. अनेक […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका महापौरपदावरून राजकीय घडामोडींना वेग; संजय राऊतांचा शिंदे सेनेवर मोठा दावा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात हालचाली सुरू असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदेंकडून लवकरच धनुष्यबाण चिन्ह जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर, “माझ्या हातात सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीचे १५ […]

अधिक वाचा..

‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात […]

अधिक वाचा..

कारेगाव गणात ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ शरद पवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार थेट आमने-सामने

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला.पण तरीही शिरुर तालुक्यात कारेगाव पंचायत समिती गण हा त्याला अपवाद ठरत आहे. या गणात शरद पवार […]

अधिक वाचा..

उमेदरीवरून राजकीय उलथापालथ! काळे गटाचा भाजमध्ये प्रवेश; भाजप–राष्ट्रवादी थेट आमनेसामने

पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील […]

अधिक वाचा..

महापालिका निवडणुकांत महायुतीचा धडाकेबाज विजय; महापौरपदावरून राजकीय हालचालींना वेग

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, भारतीय जनता पार्टी (भाजप) हा स्पष्टपणे सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने अनेक महापालिकांमध्ये एकहाती सत्ता मिळवली असून, महायुतीने (भाजप–शिवसेना शिंदे गट–राष्ट्रवादी अजित पवार गट) २५ हून अधिक महापालिकांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालांतून जनतेने भाजप व महायुतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे चित्र दिसून येते. […]

अधिक वाचा..

कोण बनणार मुंबईचा महापौर? राजकीय समीकरणांचा खेळ!

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…” मुंबईच्या हितासाठी! मुंबई: मुंबईच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय समीकरणे प्रचंड वेगाने बदलत असून, प्रत्येक पक्ष आपापली ताकद अजमावत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले, काहींनी वेगळे राजकीय मार्ग निवडले. राज ठाकरे यांनी “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” […]

अधिक वाचा..