पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. प्रत्येकाने मतदारांपर्यंत पोहोचताना चांगला संदेश द्यायचा आहे. त्यादृष्टीने आपापल्या मतदारसंघात काम होणे गरजेचे आहे. पक्षाच्या वाढीसाठी सकारात्मकपणे काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा, महिलांना बस प्रवासात […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यसरकार बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध; छगन भुजबळ

नाशिक: नाशिक जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राज्यसरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन नाशिक येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरात भडकले

प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा संकेत मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे सर्वोच्च आहे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात, त्यामुळे निदान प्रश्नोत्तराच्या तासाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. हा संकेत आता पाळला जात नाही, अध्यक्षांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सक्त शब्दात टाकीत दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे […]

अधिक वाचा..

दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का?

मुंबई: सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत म्हणून तर दोन दिवस […]

अधिक वाचा..

माझ्या मतदारसंघाला ५८० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती चुकीची; जयंत पाटील

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्कॉर्मशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटी रुपये […]

अधिक वाचा..

सरकारने ‘उमेद’च्या मोर्चाला सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात; नाना पटोले

मुंबई: ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद, राबिवले जात आहे. उमेदच्या कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी उमेदच्या लाखो महिलांचा आझाद मैदानावर मोर्चा आलेला आहे. भर पावसात हा मोर्चा आलेला असून राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको; नाना पटोले

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने सरसकट मदत द्यावी, अशी […]

अधिक वाचा..

संकटकाळात सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी; अजित पवार

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांसह मोफत अन्न-धान्य वाटप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

… तर किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोहीच, थांबवा हा राजकीय नंगेपना हा असा असतो का स्त्रीसन्मान?

मुंबई: स्त्रीसन्मानाच्या गोष्टी करणारे देशाचे पंतप्रधान किती स्त्रीसन्मान राखतात हे दिल्लीतील कुस्तीगीर खेळाडूंच्या दोन महिने चाललेल्या आंदोलनातून दिसून आले. महिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने त्या महिलांना आंदोलन करावे लागेल आणि त्यांची फरपट कशाप्रकारे झाली हेही जगाने पाहिले आणि आता तर स्वतःला भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ म्हणणारे “हातोडा सम्राट” माजी खासदार कीरिट सोमय्या यांच्यां कथित […]

अधिक वाचा..