गोष्ट भिगवणच्या लेकीची; प्रेमप्रकरणाला राजकीय व धार्मिक वळण, संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर

इंदापूर (पुणे):  पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आंदोलन, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली; मात्र संबंधित तरुणीने २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत ती स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. तिने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर […]

अधिक वाचा..

राजकीय उलथापालथ; ठाकरे गटाचे विलीनीकरण, काँग्रेसचे संख्याबळ वाढले

अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन महिना उलटला असला तरी काही ठिकाणी सत्तासमीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेत तर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. काँग्रेसचे बळ वाढले, वंचितचा पाठिंबा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत […]

अधिक वाचा..

नंदनवनमध्ये राजकीय नव्हे तर ‘कलारसिक’ भेट; राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथे आज एका वेगळ्या आणि लक्षवेधी भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र ही भेट केवळ राजकीय नव्हती, तर कलारसिकतेचा सुंदर संगम ठरली. नंदनवन बंगल्यात लावण्यात आलेली मुंबईतील हेरिटेज वास्तूंची दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहताना राज ठाकरे अक्षरशः भारावून गेले. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात राजकीय खळबळ! शिंदे गटात राजीनामा, भाजपात गटबाजी, ठाकरे गटात निलंबनाची टांगती तलवार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पश्चिम बंगालवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; निर्मला सीतारमण यांची टीका

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आज लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करत सभागृहात राजकीय वातावरण तापवले. बजेटमध्ये पश्चिम बंगालचा उल्लेख नसल्याचा टीएमसी खासदार सौगत राय यांनी केलेला आरोप फेटाळून लावताना सीतारमण म्हणाल्या, “पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे राज्य […]

अधिक वाचा..

पन्हाळा–हातकणंगलेत राजकीय समीकरणे बदलली; सातवे–पोर्लेत राष्ट्रवादीचा गुलाल

कोडोली–कुंभोजमध्ये जनसुराज्यचा दबदबा पन्हाळा: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांना त्यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सातवे आणि पोर्ले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा धक्का बसला आहे. मात्र, कोडोली, कुंभोज आणि टोप परिसरात जनसुराज्यने आपले वर्चस्व कायम राखत ताकद […]

अधिक वाचा..

प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य दुर्दैवी व राजकीय संस्कारशून्य; राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र निषेध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब तसेच पवार कुटुंबीयांबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार आणि राजकीय संस्कारशून्य आहे. अशा विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. पार्थ पवार हे शरद पवार साहेबांना केवळ कुटुंबीय म्हणून भेटतात, असे विधान करून दरेकर यांनी केवळ एका कुटुंबावर […]

अधिक वाचा..

नवीन बँकिंग सुधारणा कायद्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ; जिल्हा बँकांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील सहकारी आणि विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे राजकारणाची सूत्रे हातात ठेवणाऱ्या संचालकांना केंद्र सरकारच्या नव्या बँकिंग सुधारणा कायद्यामुळे मोठा धक्का बसला आहे. ‘बँकिंग कायदा (दुरुस्ती) – २०२५’ नुसार आता कोणत्याही सहकारी बँकेवर एका संचालकाला जास्तीत जास्त १० वर्षेच काम करता येणार आहे. या कायद्याची सर्वात कळीची बाब म्हणजे त्याची पूर्वलक्ष्यी प्रभावाने अंमलबजावणी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी! अजित पवारांच्या निधनानंतर शिंदे गटाच्या निर्णयांमुळे महायुतीत वाद

मुंबई:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गोंधळ सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे राज्य अजूनही शोककळेत आहे, असा उल्लेख करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:चा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे म्हणाले, “अजित पवार यांच्या निधनामुळे झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. ९ फेब्रुवारीला कोणताही कार्यक्रम किंवा सोहळा आयोजित करू नये, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये राजकीय रंग

मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकांचा फटका आता खेळाडूंपुरता नाही, तर राजकारण्यांपर्यंत पोहोचला आहे. मैदानावरील फलंदाजी आणि बॉलिंगपेक्षा निवडणुकीतील राजकीय रणनीती जास्त चर्चेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केलेल्या टिपणीनुसार, “ज्यांना बॅट कशी धरायची हे माहीत नाही, त्यांनी क्रिकेट प्रशासन करु नये”, या विधानामुळे क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणि पात्रतेवर जोर दिला गेला आहे. मात्र निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..