जांबुत ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची मागणी; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करत तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली असून, ३० ऑगस्ट २०२२ पासून दत्तात्रय जोरी हे सरपंच म्हणून कार्यरत […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! थेट निवडून आलेल्या सरपंचांना ग्रामस्थांचा झटका

लोणवळ: गावच्या सरपंच मुक्ताबाई राठोड यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत तब्बल ६७४ मतांनी मंजूर झाला आहे. आवश्यक बहुमत मिळाल्याने राठोड यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागणार असून तालुक्यात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अविश्वास ठरावासाठी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. मतदान प्रक्रियेत ६७४ मतदारांनी ठरावाच्या बाजूने कौल दिल्याने ठराव मंजूर […]

अधिक वाचा..

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी आल्याचा दावा

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी मोर्चे काढले होते. या वाढत्या दबावानंतर पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली असून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हा कटाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला […]

अधिक वाचा..

कारेगाव ग्रामपंचायतीत सत्तेचा ‘सावळा गोंधळ’ सरपंच पदाचा वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिघळला

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील ‘सरपंच’ पदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ठरलेल्या वेळेत राजीनामा न दिल्याने ग्रामपंचायत सदस्यांसह थेट ग्रामस्थांनाच बैठक बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे. सरपंच-उपसरपंच पद कोणाला द्यायचे, किती कालावधीसाठी द्यायचे, राजीनामा घ्यायचा की नाही—या सर्व प्रश्नांची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात आहेत, हा प्रश्न आता कारेगावकरांना पडला आहे. देवाच्या शपथा…पण त्या पाळल्याचं […]

अधिक वाचा..

महिला सरपंचांच्या नावावर पतीचा कारभार आता चालणार नाही

औरंगाबाद: ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच निवडून आल्यानंतरही प्रत्यक्षात त्यांचा कारभार त्यांचे पतीच पाहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या ‘सरपंच पती’ प्रथेला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. पंचायत राज मंत्रालयाचा मोठा निर्णय केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशीलकुमार लोहाणी यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मॉडल वूमन फ्रेंडली […]

अधिक वाचा..
rajendra-dhaybar

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचयातीच्या उपसरपंचपदी राजेंद्र रामदास धायबर यांची मंगळवारी (ता. २५) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. वाघाळे ग्रामस्थांसह परिसरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरपंच अनिता गावडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. निवडणुकीचे कामकाज ग्रामसेविका शितल भालशिंग यांनी पाहिले. तत्कालीन उपसरपंच दादा सोनवणे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला व राजेंद्र धायबर यांचा एकमेव अर्ज […]

अधिक वाचा..
SARPANCH

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

मुंबईः नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी संपविल्या जाणार आहेत. दरम्यान, […]

अधिक वाचा..

म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश पोपट नरसाळे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीत निलेश पोपट नरसाळे यांची एकमताने सरपंचपदी निवड करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच मंगलताई जयवंत मुसळे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. ही निवड प्रक्रिया मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले,ग्राम महसुल आधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, तसेच ग्रामसेविका पल्लवी गावडे (रंधवान) यांच्या उपस्थितीत पार पडली. […]

अधिक वाचा..

गावातील सरपंचापासून ते ग्रामसेवकापर्यंत आता सर्वांवर असणार केंद्र सरकारच्या AI ची करडी नजर

मुंबई: तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. कारण केंद्र सरकारने अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक नवी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे. गावागावांत सतत तक्रारी येतात की ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत नाहीत, निधीचा अपव्यय होतो, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. पण आता हे प्रकार […]

अधिक वाचा..

सरपंच, उपसरपंचांच मानधन झाले दुप्पट

नाशिक: राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर योजना आणि निर्णयांचा धडाका लावला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच, उपसरपंचांना दिले जाणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीसुद्धा सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती. परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात गेली अनेक वर्षांपासून वाढ झालेली नसून त्यांची केवळ 200 रुपये बैठक भत्त्यावर बोळवण केली जात आहे. शासन सरपंच, उपसरपंचांवर मेहरबान, […]

अधिक वाचा..