महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी […]

अधिक वाचा..

स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असत भाऊ…

मुंबई: स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असतं भाऊ? या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी “मुंबई  मराठी  ग्रंसंग्रहालया”च्या “सुरेंद्र  गावसकर सभागृहा”त  करण्यात आले होते. मा .राज्य महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, विद्याताई चव्हाण, मा. अध्यक्ष माविम, ज्योती  ठाकरे, मा. वृषाली मगदूम, मा. संस्थापक, जिजाऊ वुमन लीगल फोरम, ऍड. शुभांगी सारंग यांनी आपली परखड मते मांडली.  सुसंवादक म्हणून […]

अधिक वाचा..

केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का?

मुंबई: सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलीसांनी वेल्हे येथील दर्शना पवार खून प्रकरणाचा केला उलगडा; आरोपी जेरबंद

शिरुर (तेजस फडके): वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावच्या हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी दि 18 जुन 2023 रोजी दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा घडल्यापासून यातील संशयित सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिस तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन त्याला मुंबई, अंधेरी […]

अधिक वाचा..

योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे

शिरुर (तेजस फडके): आपले सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासने ही जीवन संजीवनी आहे. शरीर ‘मन ‘आणि श्वासाचे एकमेकांशी संतुलन साधल्याने जीवनाचा प्रवास शांत, प्रसन्न ,रम्य आणि उत्साही होत राहत असतो. मन, बुद्धी ,जीव हे शरीराचे आश्रयाने राहतात. प्रत्येक अवयवाला व्यायाम घडणे गरजेचे आहे. हात,पाय, पोट, फुफ्फुसे हृदय यांच्या नियमित हालचाली दररोज घडणे म्हणजे अवयवांचे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमची खास डील फायनल होऊ शकते. यासोबतच तुमच्या शारीरिक विकासाच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. तुम्हाला कोणत्याही मंगलोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात शुभ खर्चाने तुमची कीर्ती वाढेल. वृषभ: आज नवीन योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. एखाद्या पवित्र स्थळाला भेट देऊन मनःशांती मिळेल. तसेच तुम्हाला कोणत्याही कायदेशीर वादात यश मिळू शकते. तुम्हाला […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ साजरा; आंदोलन करत गद्दारांचा केला निषेध…

मुंबई: पन्नास खोके, एकदम ओके… पन्नास खोके खाऊन माजलेत बोके…खोके सरकार हाय हाय,गद्दारांना इथे जागा नाय… महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दारांच्या विरोधात आंदोलन केले. आज ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी भवनच्या बाहेर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हातभार लावणार्‍या चाळीस गद्दारांच्या विरोधात हे […]

अधिक वाचा..

राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही; मुकुल वासनिक

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू; नाना पटोले मुंबई: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार झाली पण या राज्यघटनेचे बीज स्वातंत्र्यापूर्वीच कराची अधिवेशनात पेरले गेले होते. स्वातत्र्यानंतर देश कसा असेल, कोणासाठी स्वांतत्र्य हवे, याचा विचार झाला तेव्हा सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा देश उभा करण्याचा विचार झाला आणि त्यातच राज्यघटनेचे बीज रोवले गेले. […]

अधिक वाचा..

कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्याविरोधात लढत राहणार

मुंबई: या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. दरम्यान ‘महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा’… ‘मोडेन पण वाकणार नाही’ जे ‘गद्दार’ […]

अधिक वाचा..

आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल…

मुंबई: आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असे स्पष्ट मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. […]

अधिक वाचा..