नाट्य परिषदेच्या नाट्य संकुलात तीन वर्षांनंतर तिसरी घंटा वाजली…

मुंबई: शनिवार (दि.  ५) ऑगस्ट २०२३ रोजी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंतराव चव्हाण नाटय संकुल रंगमंदिराचा पडदा उघडला. विशेष म्हणजे ह्या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांनी घेतला. तसेच रंगशारदा प्रतिष्ठानचे विजय गोखले आणि […]

अधिक वाचा..

दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या भाजपाचाच भ्रष्ट चेहरा उघड करु

मुंबई: काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत ही बैठक होत असून राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होत असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट तयार करण्यात […]

अधिक वाचा..

कुठे चाललाय आमचा महाराष्ट्र 

मुंबई: सरकारच डोक ठिकाणावर आहे का? अस ठणकावून विचारणारे जहाल स्वातंत्र्य सेनानी ‘केसरी ‘चे संपादक, सार्वजनिक गणपति, नवरात्र उत्सवांच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी जागृती करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी १ ऑगस्ट ला साजरी केली. गरिबांच्या हक्कासाठी आवाज बुलंद करणारे, आपल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून इंग्रजांनाही सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती  ३ ऑगस्टला […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणारच; सरकारचा मोठा निर्णय…

संभाजीनगर: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचललं असून शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा मिळणार असून, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कार्यालयात तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ६७ वर्षापासून विजचोरी होत आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे. राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे […]

अधिक वाचा..

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील उद्योजक सतिश खंडू नाईकरे यांचा आज (दि 5) रोजी पुणे-नगर महामार्गांवर बोऱ्हाडे मळा येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. सतिश नाईकरे यांचा हॉटेल व्यवसाय असुन आज सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावरुन आपल्या दुचाकी वरुन एका वेटरला घेऊन ते शिरुरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी एका मालवाहतूक ट्रॅकच्या […]

अधिक वाचा..

पुणे-नगर तीन मजली महामार्गाला स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच नांव देणार 

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतुक कोंडीवर तीन मजली रस्ता व्हावे हे माजी स्वर्गीय आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करुन ज्या वेळी या रस्त्यावर तीन मजली रस्ता पूर्ण होईल तेव्हा त्या रस्त्याला पाचर्णे यांचे नाव देण्यात येईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुणे […]

अधिक वाचा..

स्व. मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंगणवाडीच्या लहान मुलांना साहित्य वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर हवेलीचे स्वर्गीय माजी आमदार बाबुराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमधील अंगणवाडीच्या लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने खुर्च्या, चटई, टेबल आदी साहित्य वाटप करण्यात आले आहे. शिरूर शहरातील मुंबई बाजार या अंगणवाडीच्या शाळेला ५० खुर्च्या, ४ मोठ्या चटई आणि टेबल अशा स्वरूपाच्या वस्तू श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.शहर प्रमुख सुनील […]

अधिक वाचा..

राहुलजी गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक

मुंबई: काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुलजी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुलजी गांधींच्या शिक्षेला स्थगिती […]

अधिक वाचा..

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार; अजित पवार 

मुंबई: मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारमतींच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या भावनांचा सकारात्मक विचार केला जाईल. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या […]

अधिक वाचा..