मानव विकास परिषदेच्या वतीने रांजणगाव मध्ये संविधान दिनानिमित्त MPSC च्या विद्यार्थ्यांचा सत्कार

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे संविधान दिनाचे औचित्य साधुन मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरुर तालुक्यातील MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 11 विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानव […]

अधिक वाचा..

शिरुर विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांची तब्बल 29 वर्षांनी स्नेह संमेलनानिमित्त भरली शाळा

शिरुर (सतिश धुमाळ): आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणुन येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षांनी निमित्ताने एकत्रित आलेल्या शिरुर येथील विद्याधाम प्रशालाच्या सन १९९३ च्या इयत्ता १० वी च्या तुकडीतील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ५० झाडे शहरातील डोंगरावर लावली. शहरातील शिरुर देवराई सह्याद्रीचा वतीने पुणे […]

अधिक वाचा..

शिरुर येथे तब्ब्ल 32 वर्षांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची भरली शाळा

शिरुर (मुकुंद ढोबळे): थरथरते हात… चालण्यातही मंदपणा.. क्षीणन झालेले शरीर.. तर काही आजही तसेच…. ज्यांचे धपाटे पाठीत खाल्ले त्या धपाट्यांनी दिलेकी शिकवण…घेऊन 32 वर्षांनी त्याच गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत फुलांच्या पायघड्या … फुलांची पायावर उधळण करीत… चरण पूजन.. औक्षण करीत… विठ्ठलरुपी गुरुजनांना विठ्ठल रुक्माई ची मूर्ती ही भेट देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज त्यांचा […]

अधिक वाचा..

शाळेतील सुविधांचा वापर करत विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे; अंकुश शिवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शाळेतील भौतिक सोयी सुविधा तसेच शैक्षणिक साहित्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आधुनिक भारताचा सक्षम नागरिक बनवावे, असे प्रतिपादन वढू बुद्रुकचे माजी सरपंच अंकुश शिवले यांनी केले. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळा शिवले मळा या शाळेला एच एम क्लाउस इंडिया प्राव्हेटेड लिमिटेड या कंपनीने दिलेल्या अत्याधुनिक संगणक […]

अधिक वाचा..

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

औरंगाबाद: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असणं बंधनकारक आहे. शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी हंसाप्रमाणे दृष्टी ठेवावी; तुकाराम शिरसाट

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हंसा प्रमाणे उत्कृष्ट शोधण्याची दृष्टी असायला हवी. ती विकसीत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयात अडकून न पडता वाचनीय पुस्तके वाचावीत तसेच आत्ताच्या सोशल मीडियाच्या मोहजालात न अडकता ग्रंथालयाशी मैत्री करून सातत्याने नवनवीन पुस्तके वाचून हंसाप्रमाणे दृष्टी ठेवावी, असे मत प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी व्यक्त केले. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव […]

अधिक वाचा..

कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ या निर्णयाची अंमलबजावणी करावी…

मुंबई: कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील मयत झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. विद्यार्थी हित […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार, महिलेस अटक…

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील बोरिवली एमएचबी पोलिसांकडून गुरुवार (दि. 22) रोजी दुपारी एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या […]

अधिक वाचा..

पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पहा काय…

औरंगाबाद: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा समावेश असलेल्या मोफत वह्या दिल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत असल्यामुळे आता सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता […]

अधिक वाचा..

पुणे विद्यापीठाच्या निकालातील त्रुटींमुळे विद्यार्थी आक्रमक…

पुणे : नुकताच पुणे विद्यापीठाने एलएलबी आणि बीएएलएलबीचा निकाल जाहीर केला. एकीकडे कंम्बाईन पासिंगमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचा दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना पेपर मध्ये शून्य मार्क मिळाल्याचे आढळून आले. तसेच अनेक विषयांना सारखेच गुण मिळाले आहेत असे समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आल्या. पुरवणी जोडून चांगला पेपर लिहून देखील शून्य […]

अधिक वाचा..