एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या अहवालावर आधारित विधेयक २९ एप्रिलपूर्वी मंजूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार का करत आहे, असा सवाल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था असताना, घाईगडबडीत […]

अधिक वाचा..

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित; राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न

पुणे: गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुर्नगठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप लवकरच निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. पुणे विधान भवनातील झुंबर सभागृहात झालेल्या या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, आमदार आणि आरोग्य तज्ज्ञ […]

अधिक वाचा..

तुही यत्ता कंची? खरात प्रकरण, महिला अत्याचार आणि सत्तासंघर्षावरून सरकारला सवाल

महिला सुरक्षेवरून राजकारण तापले; अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा मुंबई: राज्यात सध्या उघडकीस आलेल्या कथित ‘भोंदू बाबा’ खरात प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. “लाडकी बहिण” योजनेच्या गाजावाज्यात महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेबाबत सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीतही तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. […]

अधिक वाचा..
vaishnavi-jamkar-lonikand

लोणीकंद येथील ‘वैष्णवी’ने सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच संपवलं जीवन…

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात युवतीने आपलं जीवन संपवल्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या केलेल्या विवाहीत युवतीचे नाव आहे. सासरच्या लोकांकडून, छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्याने वैष्णवीने घरातच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, मुलीच्या कुटुंबीयांकडून दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू-सासरा […]

अधिक वाचा..

महिलांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत; शक्ती कायदा लवकरच; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली. महिलांच्या सुरक्षेसह सन्मान, संधी आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महिला दिनानिमित्त विधानपरिषदेत झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना पवार […]

अधिक वाचा..

कट मारल्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; महिलेसह दोन अल्पवयीनांवर गुन्हा

पुणे: शहरातील कोंढवा परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी चालवताना ‘कट’ मारल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहेत. या घटनेमुळे भाग्योदयनगर परिसरात काही काळ खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी […]

अधिक वाचा..

महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक विभागाने ठोस पावले उचलावीत: डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

जागतिक महिला दिनानिमित्त विधानपरिषदेत विशेष चर्चा; ‘उभारी’ प्रकल्प आणि सुरक्षा ऑडिटवर दिला भर ​मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज विधान परिषद सभागृहात महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा घडवून आणण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या चर्चेचा प्रस्ताव मांडला. चर्चेच्या समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर संरक्षणासाठी राज्य सरकारने […]

अधिक वाचा..

प्रेमप्रकरणातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा यांची हत्या; आरोपी अटकेत

श्रावस्ती (उत्तर प्रदेश): प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा (35) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज वर्मा या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंचल मिश्रा या किसान युनियनच्या सभेला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याने […]

अधिक वाचा..

विधानभवन येथे महिला सुरक्षा सेफ्टी ऑडिटचा आढावा; तातडीच्या अंमलबजावणीचे निर्देश

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित […]

अधिक वाचा..
Kavita-Dhaybar

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील कविता संदीप धायबर यांना महिला सबलीकरण व उन्नतीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो टायर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारादरम्यान कविता धायबर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. […]

अधिक वाचा..