मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज वाळकेश्वर येथील पवित्र बाणगंगा तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.यावेळी “अमर रहे… अमर रहे… अजितदादा अमर रहे…” अशा भावनिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, संजय तटकरे, मुंबई उपाध्यक्ष कप्तान मलिक, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र राणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव, महिला अध्यक्षा आरती साळवी, कार्याध्यक्षा मनिषा तुपे, ओबीसी सेलचे मुंबई अध्यक्ष बबन मदने, सहकार सेलचे मुंबई अध्यक्ष नंदकुमार काटकर, मुंबई सरचिटणीस दिपक पारडीवाला यांच्यासह पक्षाचे प्रदेश, मुंबई पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्याची आठवण ठेवत त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.