शिरुर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे यांच्या पुढाकाराने बाबुरावनगरमधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बाबुरावनगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या सांडपाण्याच्या गंभीर समस्येबाबत ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेतली आहे. शिरूर ग्रामीणचे उपसरपंच संजय शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत तुंबलेली ड्रेनेज लाईन मोकळी करुन सांडपाण्याचा प्रश्न सोडविला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.   […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांवरील ट्विटचा अपमानाचा हेतू नव्हता; वातावरण तापवण्याचा भाजपचा प्रयत्न; अतुल लोंढे

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना कमी लेखण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. काही जण राजकीय फायदा मिळवण्यासाठी या मुद्द्याचे भांडवल करून वातावरण तापवत असल्याची टीकाही त्यांनी केली. अतुल लोंढे म्हणाले की, […]

अधिक वाचा..

डोकेदुखीचे प्रकार, कारणे, उपाय

डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव घेतलेला असेलच. आज बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे डोकेदुखी होणे अगदी सामान्य झाले आहे. डोकेदुखीची कारणे वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची सवय, चहा-कॉफी अधिक पिणे, ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्ही समोर सतत बसणे, अपूर्ण झोप, मानसिक ताणतणाव, अतीप्रवास, बैठी जीवनशैली, […]

अधिक वाचा..

अश्रू जबरदस्तीने रोखणं पडू शकतं महागात, होऊ शकतं गंभीर नुकसान

वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. काही लोकांच्या डोळ्यातून खूप अश्रू येतात तर काही लोकांना अजिबातच रडू येत नाही. तर काही लोक डोळ्यातील अश्रू रडताना रोखून धरतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकत. अश्रू रोखण्याचे नुकसान […]

अधिक वाचा..

सुनेत्रा वहिनींवर टीका म्हणजे महिला उपमुख्यमंत्र्यांचा अपमान; काँग्रेसने आधी स्वतःचा इतिहास पाहावा; धनंजय मुंडे

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेचा आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत समाचार घेतला. सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करून काँग्रेसने महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दलचा आपला द्वेषच दाखवून दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी कठीण परिस्थितीत जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी त्या दिवस-रात्र काम करत […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे. काही राशींच्या व्यक्तींना व्यवसाय व करिअरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना आर्थिक नियोजन, कौटुंबिक सौहार्द आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठीही अभ्यास, स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्साहवर्धक ठरण्याची चिन्हे आहेत. मेष […]

अधिक वाचा..

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेमागे भाजप आणि पोलिसांची फूस असल्याचा गंभीर आरोप केला. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असून, काँग्रेस गांधींचा अहिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात पोहोचले, तरी पोलिसांना […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव, जनसंपर्क आणि अभ्यासपूर्ण कामकाजाचा मंत्र दिला. “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. नागरिकांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा,” असे आवाहन त्यांनी केले. रामभाऊ म्हाळगी […]

अधिक वाचा..

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत 

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं. किडनी स्टोन झाल्यावर पोटात दुखतं आणि लघवी करतानाही त्रास होतो. किडनी स्टोन झाल्यावर असह्य वेदना होतात. अशात काही औषधांनी किंवा सर्जरी करून किडनी स्टोन बाहेर काढले जातात. किडनी स्टोन झाल्यावर कोणती फळं खावीत १) पाणी असलेली फळ किडनी स्टोनच्या रूग्णांना […]

अधिक वाचा..

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात. पण सोबतच काही लोक एक्सरसाईज दरम्यान काही चुका करतात ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. बरेच लोक एक्सरसाईज केल्यानंतर लगेच पाणी पितात. असं करणं आरोग्यासाठी नुकसान कारक ठरू शकतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जास्त पाणी पिऊ नका तुम्ही जर खूप […]

अधिक वाचा..