Shirur Police Station

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत भावाच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकत त्याच्या कुटुंबावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना निमगाव दुडे (ता. शिरूर) येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात शेतकरी, त्यांची पत्नी आणि वृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात ४ जणांविरोधात […]

अधिक वाचा..
warude-murder-case

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यानेच कोयत्याने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वरूडे (ता. शिरूर) येथील रानमळा परिसरात राहणारे बाळासो बबन तांबे (वय […]

अधिक वाचा..

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक तरतूद या निर्णयांना काँग्रेसचा विरोध नसला, तरी हे निर्णय विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जाहीर करण्यात आल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे. गाडगीळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारले की, राज्यात आचारसंहिता लागू […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने ती फसवी कर्जमाफी असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सरकार सांगत असलेल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष लाभार्थ्यांची […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवत महामंडळावरील आपले वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. महामंडळाच्या एकूण १७ […]

अधिक वाचा..

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: “नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. समाजामध्ये नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.जागतिक नेत्रदान दिनानिमित्त १० जून रोजी राज्यभर नेत्रदान जनजागृती उपक्रम आणि नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. […]

अधिक वाचा..

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० जून रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची बैठक बोलावल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आता गुरुवार, ११ जून रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार Sunil Tatkare यांनी पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘भारतातील आर्थिक-राजकीय संकटे : वास्तव आणि परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुणकुमार, पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर तसेच प्रदेश […]

अधिक वाचा..

विक्रोळीत अवयवदान जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिघांनी भरले अवयवदान संकल्पपत्र

मुंबई: विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहार येथे 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा विक्रोळी शाखा आणि तक्षशील बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अवयवदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया आणि प्रत्यारोपण व्यवस्थेची माहिती उपस्थितांना देण्यात आली. लाईव्ह बियॉन्ड लाईफ […]

अधिक वाचा..

राज्यात ३६ जिल्ह्यांत सुरू होणार सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे; प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार जिल्ह्यातच मार्गदर्शन

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत […]

अधिक वाचा..