छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध सामाजिक व राजकीय स्तरांवरून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेल्या संघर्षपूर्ण लढ्याचा इतिहास लक्षात घेता, त्यांच्या पराक्रमाबाबत कोणतेही अवमानकारक विधान अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाहीसह मोगल […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकांबाबत गायकवाड यांनी केलेली भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप आणि मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी ‘राजगृह’ येथे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून राजगृहासमोरील पदपथावर फिरती शौचालये उभारण्यात आली होती. त्या दिवशी स्थानिक […]

अधिक वाचा..

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत चौथ्या रिव्हर्स बायर-सेलर मीटचे आयोजन करण्यात आले आहे. हा आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यक्रम इंडिया एसएमई फोरमच्या सहकार्याने 27 व 28 एप्रिल 2026 रोजी द लीला हॉटेल, अंधेरी, मुंबई येथे पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमातून निर्याताभिमुख एमएसएमई उद्योगांना जागतिक […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल हे शिरूर मध्ये आले होते. त्यांना अवैध धंद्यांची माहिती कळतात त्यांनी कठोर भूमिका घेत शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना शिरूर पोलीस ठाणे […]

अधिक वाचा..

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे. मंगळवारी वरळी डोम परिसरात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजप महायुतीने मोर्चा काढला होता. ऐन गर्दीच्या […]

अधिक वाचा..

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये “पहिला अधिकार कुणाचा?” हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मात्र, कायद्याच्या दृष्टीने याचे स्पष्ट उत्तर आहे — कोणालाही ‘पहिला हक्क’ दिलेला नाही. कायदा काय सांगतो? भारतातील हिंदू कुटुंबांसाठी लागू असलेल्या हिंदू उत्तराधिकार कायदा 1956नुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर क्लास-1 वारस यांचा […]

अधिक वाचा..

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (वर्किंग नॉलेज) अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील लघु नाट्यगृह (तिसरा मजला), प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. ‘गोंधळ’ हा संतोष डावखर दिग्दर्शित […]

अधिक वाचा..